शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:19 IST

आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे.

ईशान्येकडील भागात पुरामुळे लाखो लोक अडचणीत आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये ५.५ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. ईशान्येकडील भागात पूर आणि भूस्खलनामुळे आसाममध्ये सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेशात १०, मेघालयात सहा, मिझोराममध्ये पाच, सिक्कीममध्ये तीन आणि त्रिपुरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. रिपोर्टनुसार, १५ नद्यांना पूर आला आहे. सिक्कीममधील छातेन येथील लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनामुळे तीन जवानांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जवान बेपत्ता आहेत, असं संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलं.

हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान

मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट 

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी सर्वात जास्त नुकसान झालेल्या लखीमपूर जिल्ह्याला भेट दिली आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये बहुतेक ठिकाणी सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुरामुळे लाखो लोकांना फटका

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, २२ जिल्ह्यांतील  ६५ महसूल क्षेत्र आणि १२५४ गावांमधील ५१५०३९ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. सर्वात जास्त प्रभावित जिल्हा श्रीभूमी आहे, जिथे १९४१७२ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, त्यानंतर कछार जिल्ह्यात ७७९६१ लोक आणि नागावमध्ये ६७८८० लोक आहेत.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssam Floodआसाम पूरAssamआसामsikkimसिक्किमTripuraत्रिपुरा