शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:19 IST

आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे.

ईशान्येकडील भागात पुरामुळे लाखो लोक अडचणीत आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये ५.५ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. ईशान्येकडील भागात पूर आणि भूस्खलनामुळे आसाममध्ये सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेशात १०, मेघालयात सहा, मिझोराममध्ये पाच, सिक्कीममध्ये तीन आणि त्रिपुरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. रिपोर्टनुसार, १५ नद्यांना पूर आला आहे. सिक्कीममधील छातेन येथील लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनामुळे तीन जवानांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जवान बेपत्ता आहेत, असं संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलं.

हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान

मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट 

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी सर्वात जास्त नुकसान झालेल्या लखीमपूर जिल्ह्याला भेट दिली आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये बहुतेक ठिकाणी सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुरामुळे लाखो लोकांना फटका

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, २२ जिल्ह्यांतील  ६५ महसूल क्षेत्र आणि १२५४ गावांमधील ५१५०३९ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. सर्वात जास्त प्रभावित जिल्हा श्रीभूमी आहे, जिथे १९४१७२ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, त्यानंतर कछार जिल्ह्यात ७७९६१ लोक आणि नागावमध्ये ६७८८० लोक आहेत.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssam Floodआसाम पूरAssamआसामsikkimसिक्किमTripuraत्रिपुरा