शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

No Confidence Motion : लोकांचा या सरकारवर विश्वास नाही- तारिक अन्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 17:39 IST

तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले.

नवी दिल्ली- तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले. नरेंद्र मोदी यांचे सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे मत त्यांनी मांडले. पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा अनेकवेळा पराभव झाला आहे. यावरुन या सरकारवर लोकांचा विश्वास नाही हे स्पष्ट होते अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी सरकारवर टीका केली.

आपल्या भाषणामध्ये तारिक अन्वर म्हणाले, ''हे सरकार अच्छे दिनाच्या घोषणा करत सत्तेत आले. लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताचे चित्र बदलेल असे वाटले होते. सबका साथ सबका विकास या त्यांच्या घोषणेची आज समिक्षा केल्यास सबका साथही नाही आणि सबका विकासही नाही असे दिसत आहे. या सरकारच्या काळामध्ये केवळ काही परिवारांचा विकास झाला असेल. संपूर्ण जगभरात आपली स्थिती वाईट झाली आहे. या देशात बुद्धिजिवी लोक घाबरुन जगत आहेत. महागाईमुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. पंतप्रधान देशाचे संरक्षण करणार असे म्हणाले होते, मात्र ज्या बँकांमध्ये गरिबांनी पैसा ठेवला होता, त्या बँकांचा पैसा घेऊन काही मोजके लोक परदेशात पळून गेले, यावेळेस पंतप्रधान आणि सरकार काहीच करु शकले नाहीत.''

हे सरकार दोन माणसे चालवत आहेत. राजनाथ सिंह यांचेही मत विचारात घेतले जात नाही. भाजपाने ज्येष्ठांना मार्गदर्शक मंडळात पाठवले आहे, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन घेतले जात नाही. पंतप्रधान विरोधकांचं ऐकत नाहीत पण त्यांनी आपल्या पक्षातील लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेतला तरी त्यांच्या सरकारच्या स्थितीत फरक पडेल. त्यांची स्थिती सुधारेल अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे. पंतप्रधान स्वतःच्या पक्षाच्या खासदारांचेही म्हणणे ऐकत नाहीत, पुढील निवडणुकीत त्यांच्या दिडशे पेक्षा जास्त खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे असे मला भाजपातील लोकांकडून समजले आहे. पुढील काळात या खासदारांचा असंतोष बाहेर येईलच. असेही तारिक अन्वर यांनी सांगितले.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदNCPराष्ट्रवादी काँग्रेसLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन