शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

No Confidence Motion : लोकांचा या सरकारवर विश्वास नाही- तारिक अन्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 17:39 IST

तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले.

नवी दिल्ली- तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले. नरेंद्र मोदी यांचे सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे मत त्यांनी मांडले. पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा अनेकवेळा पराभव झाला आहे. यावरुन या सरकारवर लोकांचा विश्वास नाही हे स्पष्ट होते अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी सरकारवर टीका केली.

आपल्या भाषणामध्ये तारिक अन्वर म्हणाले, ''हे सरकार अच्छे दिनाच्या घोषणा करत सत्तेत आले. लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताचे चित्र बदलेल असे वाटले होते. सबका साथ सबका विकास या त्यांच्या घोषणेची आज समिक्षा केल्यास सबका साथही नाही आणि सबका विकासही नाही असे दिसत आहे. या सरकारच्या काळामध्ये केवळ काही परिवारांचा विकास झाला असेल. संपूर्ण जगभरात आपली स्थिती वाईट झाली आहे. या देशात बुद्धिजिवी लोक घाबरुन जगत आहेत. महागाईमुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. पंतप्रधान देशाचे संरक्षण करणार असे म्हणाले होते, मात्र ज्या बँकांमध्ये गरिबांनी पैसा ठेवला होता, त्या बँकांचा पैसा घेऊन काही मोजके लोक परदेशात पळून गेले, यावेळेस पंतप्रधान आणि सरकार काहीच करु शकले नाहीत.''

हे सरकार दोन माणसे चालवत आहेत. राजनाथ सिंह यांचेही मत विचारात घेतले जात नाही. भाजपाने ज्येष्ठांना मार्गदर्शक मंडळात पाठवले आहे, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन घेतले जात नाही. पंतप्रधान विरोधकांचं ऐकत नाहीत पण त्यांनी आपल्या पक्षातील लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेतला तरी त्यांच्या सरकारच्या स्थितीत फरक पडेल. त्यांची स्थिती सुधारेल अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे. पंतप्रधान स्वतःच्या पक्षाच्या खासदारांचेही म्हणणे ऐकत नाहीत, पुढील निवडणुकीत त्यांच्या दिडशे पेक्षा जास्त खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे असे मला भाजपातील लोकांकडून समजले आहे. पुढील काळात या खासदारांचा असंतोष बाहेर येईलच. असेही तारिक अन्वर यांनी सांगितले.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदNCPराष्ट्रवादी काँग्रेसLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन