शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

गोरक्षा :झुंडशाहीला रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:04 PM

गोरक्षेच्या नावाखाली देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूवीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली - गोरक्षेच्या नावाखाली देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूवीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत झुंडशाहीला परवानगी देता येणार नाही.  तसेच कुठल्याही नागरिकाला कायदा हातात घेता येणार नाही, असे प्रकार रोखण्यासाठी संसदेने कायदा बनवावा, तसेच सरकारने संविधानानुसार काम करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना गोरक्षेच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचाराबाबत परखड मत व्यक्त केले.  कोणत्याही परिस्थितीत झुंडशाहीला परवानगी देता येणार नाही. असे प्रकार रोखण्यासाठी संसदेने कायदे बनवण्याची आणि सरकारने संविधानानुसार काम करण्याची गरज आहे. कुणीही स्वत: कायदा हातात घेऊ शकत नाही.  समाजात शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी असून, गोरक्षकांच्या हल्ल्यातील पीडितांना सरकारने नुकसान भरपायी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच पुढच्या चार आठवड्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या आदेशांची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. 

सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी 6 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाचची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांविरोधात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी हे आदेश दिले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार