शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंचे द्रष्टेपण जगाला मान्य, धर्मनिरपेक्षता काळाची गरज

By admin | Updated: November 18, 2014 00:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़ याच अनुषंगाने जगभरातील दिग्गज आणि बिगर भाजपा व बिगर रालोआ पक्षांना काँग्रेसने सोमवारी नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात एकत्र आणले़ नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले़आपल्या भाषणात सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवरही थेट हल्ला चढवला़ अलीकडे तथ्यांचा विपर्यास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ सत्य दडवून आणि असत्याची कास धरून नेहरूंची विचारधारा डावलली जात आहे; पण नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ भारताला स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ मानवी स्वातंत्र्य आहे, हा नेहरूंचा विचार होता़ त्यांच्या याच विचारधारेने नेल्सन मंडेला आणि आँग सान सू की यांनाही प्रेरित केले, असे सोनिया म्हणाल्या़भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा संसदीय लोकशाहीवर अतूट विश्वास होता, हे सांगताना सोनियांनी १९५१ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा दाखला दिला़ त्या म्हणाल्या, पंडितजी नेहमी सांगत की, जिंकलेल्यांनी विजयाची हवा कानात शिरू देऊ नये आणि हरलेल्यांनी निराश होता कामा नये़ जय-पराजयाची पद्धत ही निवडणूक निकालांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे़ चुकीच्या पद्धतीने जिंकण्यापेक्षा योग्य पद्धतीने हरणे कधीही चांगले. नेहरूंसाठी धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्मांचा आदर हा श्रद्धेचा प्रश्न होता़ धर्मनिरपेक्षतेशिवाय कुठलाही भारतीय, कुठलाही भारत असू शकत नाही़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज आहे़ विविध जातीपंथ असलेल्या, विविध भाषा आणि संस्कृती अशा वैविध्याने नटलेल्या देशाला केवळ संसदीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकारच एकसंघ ठेवू शकते, हे नेहरूंचे विचार काळाच्या कसोटीवर खरे ठरत आहेत़माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस प्रतिनिधी मंडळाचे नेते उद्या मंगळवारी भाषण करतील आणि याचसोबत या संमेलनाची सांगता होईल़