शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे घोंगडे महावितरणच्या गळ्यात

By admin | Updated: March 19, 2016 00:03 IST

कंपनीकडून नकार : पालिकेला धाडणार पत्र

कंपनीकडून नकार : पालिकेला धाडणार पत्रनाशिक : पाणीपुरवठा काळात विद्युत मोटारींचा वापर करून पाणी ओढण्याच्या प्रकाराला आळा घालण्यास अपयशी ठरलेल्या महापालिकेने आपले घोंगडे महावितरणच्या गळी उतरविण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला आहे. पाणीपुरवठा काळात महावितरणने शहरात भारनियमन सुरू करावे अशी अजब सूचना पालिकेने पत्राद्वारे महावितरणला केली होती. या पत्राची खिल्ली उडवत महावितरणने पालिकेलाच उपाययोजना करण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. महापालिकेने शहरात आठवड्यातून दर गुरुवारी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करतानाच पाणीबचत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाना तर्‍हेचे मार्ग अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने, विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार महापालिकेसाठी डोकेदुखी ठरल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी विभागीय कार्यालयांना आदेश देण्यात आले होते. परंतु विभागीय कार्यालयाकडून सक्षमतेने कारवाई होत नसल्याने सहाही विभागातून केवळ १२५ विद्युत मोटारीच जप्त करण्यात आल्या तर केवळ दीड लाखांचा दंड करण्यात आला होता. एवढे होऊनही मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार सुरूच असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्याने पालिकेने जालीम तोडगा काढत महावितरणला भारनियमनाचे पत्र धाडले होते.शहरात होणार्‍या पाणीपुरवठा काळात पाइपलाइनमधून विद्युत मोटारी लावून पाण्याची चोरी होत असल्याने या काळात भारनियमन करण्यात यावे जेणेकरून पाणी उचलताच येणार नाही या महापालिकेच्या पत्राला महावितरणने धुडकावून लावले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र अद्याप महापालिकेला धाडले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे भारनियमन करताच येणार नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. भारनियमानाचे राज्यसाखळीतील नियोजित वेळापत्रक तयार केले जाते. शहराचा प्रकार, शहर कोणत्या श्रेणीत आहे, भारनियनाची वेळ कशी असेल याचा अभ्यास करून भारनियमनाची वेळ ठरविली जाते. शिवाय वीजपुरवठा हा फिडर निहाय केला जातो. १०० ते हजार घरांपयंर्तचा एक फिडर असतो. अशावेळी दोन-चार मोटारी लावणार्‍यांसाठी इतर ग्राहकांवर अन्याय करता येणार नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे महावितरणने पालिकेच्या पत्राला फारसे गांभीर्याने घेतले नसून आपली भूमिका निश्चित केली आहे; मात्र अद्याप पालिकेला तसे कळविण्यात आलेले नाही. महावितरणचे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता चर्चा करून या पत्राबाबत शासनालाही कळविणार आहेत.