शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

'इतरांना धमकावणे काँग्रेसची जुनी संस्कृती...', 600 वकिलांच्या पत्रावर पंतप्रधान मोदींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 6:23 PM

ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि ‘बार काउंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्यासह देशातील 600 हून अधिक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र लिहिले आहे.

Narendra Modi slams oppositon: लोकसभा निवडणूक अवघा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळेच देशातील राजकीय वाचावरण चांगलेच तापले आहे. अशातच, ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि ‘बार काउंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्यासह देशातील 600 हून अधिक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र लिहिले आहे. एक विशेष गट देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात गुंतला असल्याचे या पत्रात म्हटले. आता यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

देशातील 600 हून अधिक वकिलांनी CJI ला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'एक विशेष गट देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचे काम करत आहे. राजकीय प्रकरणांमध्ये, विशेषत: राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या प्रकरणांमध्ये दबाव आणला जातोय. हे आपल्या देशाच्या न्यायपालिकेसाठी हानिकारक आणि आपल्या लोकशाहीसाठी धोका आहे. हा विशेष गट न्यायाधीशांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो.'

'हा गट एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि नंतर त्याचाच बचाव करतो. हा गट न्यायालयाच्या चांगल्या भूतकाळाच्या आणि सुवर्णकाळाच्या खोट्या कथा रचतो आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांशी तुलना करतो. त्यांच्या टिप्पण्यांचा उद्देश न्यायालयांवर प्रभाव पाडणे आणि राजकीय फायद्यासाठी त्यांना अस्वस्थ करणे हा आहे. निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही, तर न्यायालयावर टीका केली जाते' असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. 

या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, 'दुसऱ्यांना भीती घालणे आणि धमकावणे, ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. 5 दशकांपूर्वी त्यांनी प्रतिबद्ध न्यायपालिकेची मागणी केली होती. ते निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांकडून वचनबद्धता घेतात, देशाप्रती कोणतीही वचनबद्धता ठेवत नाहीत. 140 कोटी भारतीय त्यांना नाकारत आहेत, यात काहीच आश्चर्य नाही,' अशी टीका पीएम मोदी यांनी केली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेस