शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली"; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:43 IST

Narendra Modi And Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकराझार जिल्ह्यात ४,५७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असं म्हणत पंतप्रधानांनी निशाणा साधला. आगामी निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवा आणि घुसखोरांसाठी इथे कोणतीही जागा नाही, असा स्पष्ट संदेश द्या, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा तुम्ही देश आणि आसाम या दोन्ही ठिकाणांहून काँग्रेसला हाकलून लावलं आणि भाजपा-एनडीएला संधी दिली, तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केले. काँग्रेसने आपल्या स्वार्थी राजकारणासाठी विविध समाजांमध्ये फूट पाडली, मात्र भाजपाने कायमस्वरूपी शांततेसाठी काम केलं. याच विचारातून 'बोडो शांतता करार' करण्यात आला."

"फक्त बॉम्ब आणि बंदुकीचे आवाज घुमत होते"

"या करारामध्ये पहिल्यांदाच सर्व प्रमुख संघटना आणि गटांना एकत्र आणलं गेलं. काँग्रेसने बोडोलँडच्या अनेक पिढ्यांना खोट्या स्वप्नांमध्ये अडकवून ठेवलं होतं. दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या सरकारने केवळ दिखाव्यासाठी कागदोपत्री करार केले. कोकराझारसह या संपूर्ण भागाने गेल्या दशकांमध्ये खूप काही सोसलं आणि गमावलं आहे. आम्ही तो कठीण काळ पाहिला आहे, जेव्हा या ठिकाणी फक्त बॉम्ब आणि बंदुकीचे आवाज घुमत होते. पण आज हे चित्र बदलत आहे. आज बोडोलँड शांतता आणि विकासाच्या मार्गावर चालली आहे. आसाम आज शांती आणि विकासाचा नवा अध्याय लिहित आहे."

"काँग्रेस म्हणजे खोट्या आश्वासनांचं दुकान"

पंतप्रधान मोदींनी टोला लगावला की, "काँग्रेस म्हणजे खोट्या आश्वासनांचं दुकान आहे, जे एका खोट्या आश्वासनासोबत ४ 'सुपर खोटं' भेट म्हणून देतात. कारण ती आश्वासनं पूर्ण करण्याचा काँग्रेसचा कोणताही हेतू नसतो. दुसरीकडे तुमच्यासमोर भाजपा-एनडीएचे मॉडेल आहे. आमच्या डबल इंजिन सरकारने जे सांगितलं, ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आसामचा वारसा जपण्यासाठी आणि वेगवान विकासासाठी आमचं सरकार सातत्याने काम करत आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Modi slams Congress for endangering national security with land grab.

Web Summary : PM Modi accused Congress of giving land to infiltrators, endangering national security during Assam election rally. He highlighted BJP's commitment to peace, citing the Bodo Peace Accord, and criticized Congress for false promises. He urged voters to reject Congress.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण