शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
2
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
3
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
4
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
5
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
6
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
7
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
8
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
9
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
10
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
11
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
12
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
13
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
14
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
15
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
16
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
17
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
18
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
19
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
20
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:52 IST

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती

MP Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशातीलमंडी येथे पावसामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झालं. ढगफुटीच्या घटनांमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक खासदार कंगना राणौत मदतीसाठी न पोहोचल्याने लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता कंगना राणौत तिच्या संसदीय मतदारसंघ मंडीमध्ये पोहोचल्या आहेत. सोमवारी कंगनाने मंडीमधील आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. मात्र यावेळी स्थानिकांनी तिला चांगलेच फटकारले. इथे काय फोटो काढायला आलात का असा सवाल करत आपत्तीग्रस्तांनी आपली नाराजी व्यक्त केली.

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती. यावेळी एका स्थानिक महिलेने कंगनावर आपला राग काढला. "तू फक्त तुझा फोटो काढायला आली आहेस का? असं काही  घडलं की तू दोन माणसांना पकडतेस, तुझा फोटो काढतेस आणि निघून जातेस," असं त्या महिलेने म्हटलं. महिलेच्या संतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावर कंगनाने त्या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. "सर्वजण फक्त कंगना-कंगना बोलत राहतात. माझ्याकडे कोणते मंत्रिमंडळ आहे का? माझे दोन भाऊ माझ्यासोबत असतात. मला कोणताही मदत निधी मिळत नाही. मी एक विशेष पॅकेज (निधी) आणेन, पण काँग्रेसचे सरकार तो गिळून टाकेल," असं कंगना म्हणाली.

गेल्या काही दिवसांमध्ये मंडीमध्ये १६ ठिकाणी ढगफुटी झाल्या आहेत. या पुरामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण अजूनही बेपत्ता आहेत. पुरामुळे झालेले नुकसान पाहिल्यानंतर खासदार कंगना ६ जुलैपासून पूरग्रस्त भागांना भेट देत आहे. कंगना राणौतला तिच्या दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. 'मी मंडी परिसरात फिरत होते. यादरम्यान माझ्या गाडीवर दगड पडला. हिमाचलमध्ये प्रवास करण्यासाठी हा काळ सुरक्षित नाही,' असं कंगनाने म्हटलं. यानंतर, लोकांनी कंगनाला मंडीतील पूरग्रस्त भागात न गेल्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी मला यावर भाष्य करायचे नाही. आम्ही इथे आहोत. ज्यांना काळजी आहे त्यांच्यासोबत जगण्यासाठी आणि मरण्यासाठी आम्ही इथे आहोत. ज्यांना काळजी नाही त्यांच्याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही, असं म्हटलं. यावर उत्तर देताना कंगनाने'मी सेराज आणि मंडीच्या पूरग्रस्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण जयराम ठाकूर यांनी मला रस्ते पूर्ववत होईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला होता,' असं म्हटलं.

दरम्यान, गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी शिमला येथील समेज, कुल्लू येथील बागीपुल आणि मंडी येथील एका गावात ढगफुटी झाली होती. पुरात सुमारे ५१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही कंगना अनेक दिवस आपत्तीग्रस्तांना भेटायला गेली नव्हती. त्यावेळी कंगनाने 'मी पूरग्रस्त भागातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी बोलले, त्यांनी मला सध्या हिमाचलला न येण्याचा सल्ला दिला आहे, कारण अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे,' असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना काही दिवसांनी पूरग्रस्त भागात पोहोचली होती.तिने सांगितले की, काँग्रेसच्या सुखू सरकारने मला पूरग्रस्त भागात जाण्यापासून रोखले होते. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतmandi-pcमंडीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश