शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:52 IST

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती

MP Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशातीलमंडी येथे पावसामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झालं. ढगफुटीच्या घटनांमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक खासदार कंगना राणौत मदतीसाठी न पोहोचल्याने लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता कंगना राणौत तिच्या संसदीय मतदारसंघ मंडीमध्ये पोहोचल्या आहेत. सोमवारी कंगनाने मंडीमधील आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. मात्र यावेळी स्थानिकांनी तिला चांगलेच फटकारले. इथे काय फोटो काढायला आलात का असा सवाल करत आपत्तीग्रस्तांनी आपली नाराजी व्यक्त केली.

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती. यावेळी एका स्थानिक महिलेने कंगनावर आपला राग काढला. "तू फक्त तुझा फोटो काढायला आली आहेस का? असं काही  घडलं की तू दोन माणसांना पकडतेस, तुझा फोटो काढतेस आणि निघून जातेस," असं त्या महिलेने म्हटलं. महिलेच्या संतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावर कंगनाने त्या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. "सर्वजण फक्त कंगना-कंगना बोलत राहतात. माझ्याकडे कोणते मंत्रिमंडळ आहे का? माझे दोन भाऊ माझ्यासोबत असतात. मला कोणताही मदत निधी मिळत नाही. मी एक विशेष पॅकेज (निधी) आणेन, पण काँग्रेसचे सरकार तो गिळून टाकेल," असं कंगना म्हणाली.

गेल्या काही दिवसांमध्ये मंडीमध्ये १६ ठिकाणी ढगफुटी झाल्या आहेत. या पुरामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण अजूनही बेपत्ता आहेत. पुरामुळे झालेले नुकसान पाहिल्यानंतर खासदार कंगना ६ जुलैपासून पूरग्रस्त भागांना भेट देत आहे. कंगना राणौतला तिच्या दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. 'मी मंडी परिसरात फिरत होते. यादरम्यान माझ्या गाडीवर दगड पडला. हिमाचलमध्ये प्रवास करण्यासाठी हा काळ सुरक्षित नाही,' असं कंगनाने म्हटलं. यानंतर, लोकांनी कंगनाला मंडीतील पूरग्रस्त भागात न गेल्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी मला यावर भाष्य करायचे नाही. आम्ही इथे आहोत. ज्यांना काळजी आहे त्यांच्यासोबत जगण्यासाठी आणि मरण्यासाठी आम्ही इथे आहोत. ज्यांना काळजी नाही त्यांच्याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही, असं म्हटलं. यावर उत्तर देताना कंगनाने'मी सेराज आणि मंडीच्या पूरग्रस्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण जयराम ठाकूर यांनी मला रस्ते पूर्ववत होईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला होता,' असं म्हटलं.

दरम्यान, गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी शिमला येथील समेज, कुल्लू येथील बागीपुल आणि मंडी येथील एका गावात ढगफुटी झाली होती. पुरात सुमारे ५१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही कंगना अनेक दिवस आपत्तीग्रस्तांना भेटायला गेली नव्हती. त्यावेळी कंगनाने 'मी पूरग्रस्त भागातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी बोलले, त्यांनी मला सध्या हिमाचलला न येण्याचा सल्ला दिला आहे, कारण अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे,' असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना काही दिवसांनी पूरग्रस्त भागात पोहोचली होती.तिने सांगितले की, काँग्रेसच्या सुखू सरकारने मला पूरग्रस्त भागात जाण्यापासून रोखले होते. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतmandi-pcमंडीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश