शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लोकसभा अधिवेशनात ‘तो’ दिवस सर्वात आव्हानात्मक  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 5:22 AM

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.तो ‘आव्हानात्मक दिवस’ कसा हाताळला, याचा तपशील सांगताना बिर्ला म्हणाले की, प्रत्येक सदस्याला अध्यक्ष पुरेसा वेळ देतील याचा सभागृहातील सदस्यांना आत्मविश्वास होता. विधेयकावरील कोणतेही मत, दृष्टिकोन, युक्तिवाद, चर्चा ऐकली जाणार नाही, असे होणार नसल्याची सदस्यांना खात्री होती. त्यामुळे सभागृहाचे कामकाज त्या दिवशी सहजपणे पार पडले.१९५२ पासून लोकसभेचे हे अधिवेशन सगळ्यात जास्त कामकाजाचे ठरले. सदस्यांनी जी बांधिलकी आणि शिस्त त्या दिवशी दाखवली त्यामुळे कामकाज सहजपणे होऊ शकले. खूप महत्त्वाच्या विषयांवर लोकांनी आपापल्या राजकीय पक्षांतील मतभेदांना बाजूला ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी प्रत्येक सदस्याचे सहकार्य आवश्यक असते आणि यावेळी आम्ही ते खूपच चांगल्या प्रकारे केले आहे, हे अभिमानाने देशाला सांगू शकतो, असे बिर्ला म्हणाले.१७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या कामकाजाचा तपशील बिर्ला यांनी सांगितला. ते म्हणाले, १७ जून रोजी कामकाज सुरू झाले आणि ते २६ जुलै रोजी संपणार होते; परंतु सात आॅगस्टपर्यंत ते वाढवण्यात आले. अधिवेशनात ३७ बैठका झाल्या व एकूण २८० तास कामकाज चालले आणि ३५ विधेयके संमत झाली. कामकाज चालवण्यासाठी सभागृह सायंकाळी उशिरापर्यंत ७५ तास सुरू होते. सदस्यांनी शून्य कालावधीत एक हजार ८६ विषय उपस्थित केले व त्यातील बहुतेक सदस्य हे पहिल्यांदाच खासदार झालेले होते. पहिल्यांदाच खासदार बनलेल्या २६५ सदस्यांपैकी २२९ जणांना शून्य कालावधीत बोलण्याची संधी मिळाली. ४६ महिला खासदारांपैकी ४२ जणी याच कालावधीत बोलल्या, असे बिर्ला म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाom birlaओम बिर्ला