शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मोदी सरकारकडून मुस्लिमांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे; खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 2:29 PM

भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत आता आसामधील खासदार बदरुद्दीन अजमल यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा सरकारच्या काळात मुस्लिमांसोबत मानवतेने वागवले जात नाही आहे. त्यांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. मुस्लिमांना भारतीय नागरिक मानले जात नाही आहे, असा आरोप बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे.बदरुद्दीन अजमल हे आसाममधील खासदार असून, ते एआययूडीएचे प्रमुख आहेत. सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनावर अजमल यांनी गंभीर टीका केली आहे. मुस्लिम समाजाला देण्यात येत असलेल्या दुजाभावाबद्दल ते म्हणाले की, ''तुम्ही उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागात सीएए विरोधात झालेल्य आंदोलनाच्या घटना पाहा. पोलिसांना आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला जातो. मात्र नंतर त्यांची कसलीही चौकशी होत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले जाते. असे कौतुक करतानाचे भाजपा नेत्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.जे अत्यंत लाजिरवाणे आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. भाजपाने देश चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्यातरी देश त्यांच्या ताब्यात आहे. मात्र उद्या देशाची सूत्रे अन्य कुणाच्या तरी ताब्यात असतील.''''भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे हे धोरण फार काळ चालेल, असे मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरूनही त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. ''केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज ऐकून घेऊ इच्छित नाही. आपल्याकडे बहुमत आहे त्यामुळे आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. मात्र हा केवळ भ्रम आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि नागरिकत्व कायदा लागू करून लोकांनी घुसखोर ठरवू, असे त्यांना वाटते. मात्र हे सर्व काही फार काळ चालणार नाही, असा टोलाही अजमल यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस त्यांनीच विणलेल्या जाळ्यात फसतील, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAssamआसामcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण