शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

कोट्यवधी लोकांना सावधतेचा इशारा; मोबाईल ग्राहकांची ‘केवायसी’च्या नावाखाली होतेय फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 8:48 AM

Mobile Companies alerts customers about online kyc fraud : कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करून फसवणूक करतात.

नवी दिल्ली : मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी ‘केवायसी’च्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फसवणूकीपासून सावध होण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात कंपन्यांनी ॲडव्हायजरी जारी केली आहे. सर्वप्रथम एअरटेलने फसवणूक करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यात आली होती. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी सर्व ग्राहकांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्या त्यांनी मोबाईल वापरकर्त्यांना कसे फसवित आहे, याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करून फसवणूक करतात. आता व्होडाफोन-आयडीयानेदेखील एका ॲडवाजरी जारी केली आहे. फसवणूक करणारे ग्राहकांना कसे टार्गेट करतात, याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. अज्ञात क्रमांकावरून एसएमएस आणि कॉल्स करण्यात येतात. त्यातून ग्राहकांना त्वरित केवायसी अपडेट करण्याचे सांगण्यात येते. अपडेट न केल्यास सिम ब्लॉक करण्याची धमकीही देतात. 

अशी होते फसवणूक

कॉल करणारे स्वत:ला कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात. कॉल किंवा एसएमएसवर पूर्ण केवायसी फॉर्म भरण्यास सांगतात. त्यानंतर गुगल प्ले स्टोरवरून एक क्विक सपोर्ट ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात. तेथून टीम व्ह्यूअर ॲपवर नेतात. या ॲपवरून स्कॅमर्सकडे तुमच्या फोनचे पूर्ण नियंत्रण मिळते. ते बॅंकिंग पासवर्डसह सर्व महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून बॅंकेतून पैसेही चोरू शकतात. याबाबत सर्व सेल्युलर ऑपरेटर्सने इशारा दिला असून असे कॉल किंवा एसएमएस टाळण्याची सूचना देण्यात आली आहे 

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारत