शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - ॲड. जयवंत ज्ञानयोग व्यवस्थिती

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.
मनुष्याने कोणतेही साधन करताना तत्पर असावे. परमतत्त्वापर्यंत जावयाचे असल्यास ज्ञान नावाच्या साधनामध्ये तत्पर असावे लागते. कारण अध्यात्मज्ञानाशिवाय परमात्मवस्तू प्राप्त होणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
तरी परमात्मा ऐसे।
जे एक वस्तु असे।
ते जया दिसे। ज्ञानास्तव।।
हे ज्ञान प्राप्त करण्याकरिताही चार गोष्टींची गरज आहे. विवेक, वैराग्य, शमदमारीषट्कसंपत्ती व मुमुक्षुता. संत तुकाराम महाराज म्हणतात,
फलकर तो संसार।
येश सार भगवंत।।
असा जो विचार आहे त्यालाच विवेक असे म्हणतात. माणसाने काही गोष्टींचा कधीच विचार करू नये व काही गोष्टींचा नेहमी विचार करावा. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

मी कोण ऐसा करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।
'मी'चा विचार करणे यालाच विवेक म्हणतात. प्रापंचिक भोगाविषयी जी त्यागबुद्धी निर्माण झालेली असते, तिला वैराग्य म्हणतात. तसेच इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आदी करून ज्या गोष्टी त्यांना शमदमारीषट्कसंपत्ती म्हणतात व अंत:करणात असलेली तीव्र जिज्ञासा तिला मुमुक्षुता म्हणतात. या चार गोष्टींमध्ये असलेली तत्परता म्हणजेच ज्ञानामार्गाची तत्परता होय.
अष्टांग योगाचाही विचार योगसूत्रामध्ये पतंजली मुनींनी मांडलेला आहेच. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी आठ अंगे आहेत. यामध्येही तत्पर असणे त्यासच योगामार्गातील तत्परता असे म्हटले जाते.
याज्ञवल्क्य ऋषींना दोन पत्नी, एक मैत्रेयी व दुसरी कात्यायनी. मुनींनी सर्व संपत्ती दोघींना देऊन अरण्यात निघाल्यावर कात्यायनीने त्या संपत्तीचा स्वीकार केला; परंतु मैत्रेयीने त्या संपत्तीचा त्याग करून ती आपल्या पतीबरोबर अरण्यात निघून गेली. यामध्ये कात्यायनीचे जे रूप ते भोगरूप, मैत्रेयीचे जे रूप ते त्यागरूप व याज्ञवल्क्यांचे जे रूप ते योगरूप होय. याचा अर्थ असा आहे की, ज्ञानप्राप्तीमध्ये येणार्‍या अनेक प्रतिबंधाचा त्याग करणे हीच खरी ज्ञानयोग व्यवस्थिती होय.