शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

CoronaVirus : मजुरांना घरी पाठवण्यासंदर्भात तयार होतोय 'बिग प्लॅन', पण केंद्र सरकार घालू शकतं अशी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 16:45 IST

लॉकडाऊनमुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांची कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरी जाण्याची इच्छा आहे. यामुळे आता खुद्द केंद्र सरकारच या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेतकेंद्र सरकारच या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहेउत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी या मजुरांना घरी परत आणण्यासाठी यापूर्वीच तयारी दर्शवली आहे

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला भारतही अपवाद नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांची कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरी जाण्याची इच्छा आहे. यामुळे आता खुद्द केंद्र सरकारच या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहे. त्यामुळे आशा व्यक्त केली जात आहे, की हे सर्वजण लॉकडाऊन उघडताच त्यांच्या घरी पोहोचतील.

तयार होतोय 'बिग प्लॅन' -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील या मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये चर्चा सुरू आहे. असेही समजते, की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी या मजुरांना घरी परत आणण्यासाठी यापूर्वीच तयारी दर्शवली आहे. मात्र, या मजुरांना सरळ त्यांच्या घरी पाठवले जाणार नाही. सांगण्यात येते, की आपल्या राज्यात पोहोचल्यानंतर त्यांना एका विशिष्ट ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येईल. यानंतरच त्यांना आपापल्या गावी पाठवले जाईल. यापूर्वी, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हजारो मजूर आपापल्या घरी जाण्याच्या आशेने दिल्ली आणि मुंबईतील रेल्वेस्थानकांवरही एकत्र आले होते. 

शिवराज सिंह चौहानांनी घेतला निर्णय - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना काही निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज संह यांच्या नुसार, जे मजूर राज्याच्या बाहेर लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत त्यांना परत आणण्यात येईल. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवरून संपर्क साधला आहे. मध्य प्रदेश सरकार मजुरांना परत आणण्यासाठी आपल्या पातळीवर पूर्णपणे प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर राज्यात विविध जिल्ह्यांत अडकलेल्या मजुरांनाही त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

रेल्वेमंत्र्यांना पत्र -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी, या मजुरांना मदतीचा हात देण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले होते. यात, लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालू व्हाव्यात. या गाड्या पुणे आणि मुंबईहून चालवण्यात याव्यात, अशी विनंती अजित पवार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानGovernmentसरकारGujaratगुजरातState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार