शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

'चाणक्य' शरद पवारांचा काँग्रेसला झटका; भाजपाविरोधी 'महाआघाडी'बाबत मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 8:21 AM

पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधान करून शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्नांना धक्का दिला आहे.

नवी दिल्लीः भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधून, भक्कम महाआघाडी उभी करून 2019च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का देण्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसलाच अनपेक्षित झटका बसला आहे. महाआघाडी अस्तित्वात येणं शक्य नाही, असं स्पष्ट मत देशाच्या राजकारणातील 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलंय. इतकंच नव्हे तर, पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं सूचक विधानही त्यांनी केलंय. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वप्न धुसर झाल्याचं मानलं जातंय.

'माझ्या मते, महाआघाडी हा व्यवहार्य पर्याय नाही. आजची परिस्थिती ही 1977 सारखी आहे. तेव्हा, इंदिरा गांधी समर्थ नेत्या होत्या. देशाच्या पंतप्रधान होत्या. पण, आणीबाणीनंतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेनं त्यांच्याविरोधात मतदान करून काँग्रेसला पराभूत केलं. त्या निवडणुकीत कुठलाही राजकीय पक्ष किंवा आघाडी नव्हती, तर निवडणुकीनंतर सगळे विजयी पक्ष एकत्र आले आणि जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं. त्यांना निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं नव्हतं. तसंच काहीसं 2019च्या निवडणुकीनंतर होऊ शकतं', असा अंदाज शरद पवार यांनी 'टाइम्स नाउ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वर्तवला आहे. भाजपाविरोधी महाआघाडी व्हावी, असं अनेक सहकाऱ्यांना वाटतंय, पण मला हा प्रस्ताव तितकाचा पटलेला नाही. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी शरद पवार किंवा अन्य कुणाच्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. 

आम्हाला गृहित धरू नका, असं सूचित करत माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी शुक्रवारीच विरोधकांच्या एकजुटीबाबत शंका व्यक्त केली होती. आपले पुत्र कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, याचा अर्थ ते एकत्रित निवडणुका लढवतीलच असे नाही, असं देवेगौडा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या पाठोपाठ, शरद पवार यांनीही महाआघाडीच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वास्तविक, गेली अनेक वर्षं तिसऱ्या आघाडीचे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जात होतं. पण आता त्यांनीच निवडणूकपूर्व महाआघाडी शक्य नसल्याचं मत मांडून केंद्रातील मोदी सरकारला सुखद धक्का दिला आहे. 

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये महाआघाडी झाल्यानं भाजपाला आपले गड गमवावे लागले होते. स्वाभाविकच, कर्नाटकमधील कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची एकी पाहून मोदी-अमित शहा जोडी काळजीत पडली होती. पण, शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडी अस्तित्वात न आल्यास त्यांचं राजकीय गणित तुलनेनं सोपं होऊ शकतं.       

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी