Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:24 IST2025-06-15T17:22:46+5:302025-06-15T17:24:12+5:30
Ahmedabad Plane Crash : अभिनव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विवान वारंवार त्याच्या वडिलांना भेटायचं असल्याचं म्हणत आहे.

फोटो - tv9hindi
विमान अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अभिनव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विवान वारंवार त्याच्या वडिलांना भेटायचं असल्याचं म्हणत आहे. विवान शुक्रवारी रात्री त्याच्या आईसह लंडनहून भारतात आला. जेव्हा तो लंडनहून निघाला तेव्हा तो भारतात त्याच्या वडिलांना भेटणार असा विचार करून खूप आनंदी झाला होता. पण आठ वर्षांच्या विवानला माहित नाही की त्याचे वडील आता या जगात नाहीत. अभिनव यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची पत्नी शुक्रवारी संध्याकाळी मुलाला घेऊन अहमदाबादला आली.
अभिनव यांचे नातेवाईक आशिष यांनी टीव्ही 9 भारतवर्षशी संवाद साधला आणि सांगितले की, विमान अपघाताची बातमी ऐकताच ते बिकानेरहून आले. त्यांनी डीएनए सँपल दिले आहेत. प्रशासनाने ७२ तासांचा वेळ दिला आहे. डीएनए प्रोफाइल जुळल्यानंतरच मृतदेह दिला जाईल. अभिनव यांचा आठ वर्षांचा मुलगा सतत वडिलांची आठवण काढत आहे. तो सतत मला बाबांशी बोलायचं आहे असं म्हणत आहे.
आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
अभिनव यांचं कुटुंब राजस्थानहून अहमदाबादला आलं आणि नंतर अभिनव कामासाठी लंडनला गेले. ते एक्सपोर्ट इम्पोर्टचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार होते. याच दरम्यान, त्यांच्या आजोबांचं निधन झालं. अभिनव यांचं आजोबांवर खूप प्रेम होतं म्हणून ते भारतात आले होते. त्यानंतर ते लंडनला जायला निघाले. विमानतळावर त्यांच्या आईला फोन केला आणि लंडनला पोहोचताच ते पुन्हा फोन करतील असं सांगितलं. पण याच दरम्यान त्यांना मृत्यूने गाठलं आहे.
कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
"माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर इंडियाचं विमान कोसळलं. बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरमध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विश्वकुमार रमेश हा एक प्रवासी या अपघातातून वाचला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात अहमदाबादच्या ज्या निवासी भागात विमान कोसळलं त्या भागात राहणाऱ्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांसह किमान आठ स्थानिक लोकांचाही मृत्यू झाला आहे.