लोकसभेत बजेटवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 'विकला' आहे असा आरोप केला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "काँग्रेसच्या यूपीए सरकारनेच देश 'विकला' होता आणि भारताला पाकिस्तानच्या बरोबरीला नेऊन ठेवलं होतं" असं म्हणत निशाणा साधला आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, "काँग्रेसनेच देश, शेतकरी, गरीब आणि राष्ट्र विकलं आहे. तुम्ही भारताला पाकिस्तानच्या बरोबरीला नेऊन ठेवलं होतं. किरण रिजिजू यांनी अगदी योग्य म्हटलं होतं की, भारत विकू शकेल असा कोणीही जन्माला आलेला नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असं कधीच करणार नाहीत."
अर्थमंत्र्यांनी २००९ च्या शर्म अल-शेख (इजिप्त) येथील संयुक्त निवेदनाचा संदर्भ दिला, जिथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात बैठक झाली होती. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर अवघ्या सात महिन्यांत ही बैठक झाली होती. सीतारामन पुढे म्हणाल्या, "ज्या लोकांना शर्म अल-शेखमध्ये पाकिस्तानशी चर्चा करायची होती, ते आता आम्हाला चर्चेवर सल्ला देत आहेत."
काँग्रेसनेच देश विकला - सीतारामन
अर्थमंत्र्यांनी पुढे असंही नमूद केलं की, यूपीए सरकारने जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) बाली बैठकीतही भारताच्या हिताशी तडजोड केली होती. २०१३ च्या करारामध्ये 'ट्रेड फॅसिलिटेशन एग्रीमेंट' (TFA) आणि सार्वजनिक साठा (अन्न सुरक्षा) वरील 'पीस क्लॉज' मान्य करून गरीब आणि शेतकऱ्यांचं हित विकलं गेलं. "काँग्रेसने केवळ गरीब आणि शेतकऱ्यांचं हितच विकलं नाही, तर देशालाच विकलं" अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
Web Summary : Nirmala Sitharaman retorted to Rahul Gandhi's allegations, stating the Congress-led UPA government compromised India's interests. She accused them of equating India with Pakistan and sacrificing farmers' welfare in global trade deals.
Web Summary : निर्मला सीतारमण ने राहुल गांधी के आरोपों का जवाब देते हुए कहा कि कांग्रेस नेतृत्व वाली यूपीए सरकार ने भारत के हितों से समझौता किया। उन्होंने भारत को पाकिस्तान के बराबर बताने और वैश्विक व्यापार सौदों में किसानों के कल्याण का त्याग करने का आरोप लगाया।