शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat National Conclave: ...तर खासगी गुंतवणुकीला विरोध नाही; माकप नेते सीताराम येचुरींनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:03 IST

जी गुंतवणूक आहे त्यानुसार देशात प्रोडक्टिव्ह असेट्स वाढले पाहिजे, रोजगार वाढले  पाहिजे अशा खासगी गुंतवणूकीचा आम्ही कधी विरोध केला, येचुरी यांचं वक्तव्य.

“लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणुका आणि त्याचे निकाल नाही. त्याचा अर्थ लोकशाहीचा कॉन्टेंट काय? अदानी प्रकरणावरून आज संसद चालली नाही. एककीकडे सरकार म्हणतं कोणतीही गडबड नाही, चूक नाही. जर यात कोणतीही गडबड नाही तर जेपीसीपासून का पळताय?,” असा सवाल माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी केला. 

लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत पार पडणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्यानं 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत. यावेळ सीताराम येचुरी यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

“जेव्हा तुम्ही आम्ही विरोधात होतो, तेव्हा एकत्र लढलो होतो. २ जी प्रश्नावर जेपीसी स्थापन करण्यावरून संसदेचं हिवाळी अधिवेशन स्थगित झालं होतं. केवळ निवडणुका जिंकून तुम्ही सत्तेवर आलात. त्रिपुरात त्यांच्या जागा कमी झाल्या. मेघालयात दोन जागा आल्या. पण प्रचार भाजपचा पूर्ण विजय झाला असा प्रचार होतो. दिल्लीतही त्यांचा पराभव होतो. जे दाखवलं जातंय तेच चुकीचं आहे, असं मला वाटतं. संविधानानं दिलेल्या अधिकारांचं जर उल्लंघन होत असेल तर ती लोकशाही मागे हटत आहे,” असं म्हणत येचुरी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. “देश आणि सरकारच्या धोरणामध्ये फरक समजला पाहिजे. देशाच्या विरोधात बोलू नये. पण सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उचलणं हे विरोधीपक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याला जर तुम्ही आळा घातला तर लोकशाही जातेय,” असं ते म्हणाले. 

अग्निवीरवरही भाष्य“सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्य आणि केंद्र मिळून रेल्वे, लष्कर मिळून पाच लाखांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्या का भरल्या जात नाहीत? चार वर्षांसाठी अग्निवीरांची भरती करताय. पण त्यांना पेन्शन नाही किंवा अन्य कोणत्या सुविधाही मिळणार नाहीत. चार वर्षांत ते देशाच्या रक्षणासाठी सर्वकाही करायला तयार आहेत. त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षा देणार नाही, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुविधा नाही, त्याचा आम्ही विरोध केला. जी मंजूर पदं आहेत त्यावर भरती का केली जात नाही. जी कोणती क्षेत्र असतील त्यात भरती झाली पाहिजे. मनरेगाचाही विस्तार केला पाहिजे. महासाथीच्या काळात लोकांना जगण्याचा आधार ठरलेली मनरेगा ही मोठी योजना होती,” असं येचुरी यांनी स्पष्ट केलं. 

हिंडनबर्गनं जो आरोप केला त्यावर काय झालंय याचा तपास होईल. दुसरीकडे एलआयसी आणि स्टेट बँकेचा पैसा त्यात गुंतवला आहे. हा पैसा लोकांच्या आयुष्याची कमाई आहे. जर यात काही झालं तर कोट्यवधी लोकांचं नुकसान होईल. एलआयसी, स्टेट बँक पार्लमेंट ॲक्टनं बनली आहे. याचं उत्तर तिकडे दिलं पाहिजे. अशी गोष्ट पहिल्यांदा झाली नाही. हर्षद मेहता स्कॅम, अन्य कोणती स्कॅम झाली यात जेपीसी झाली. आम्ही खासगी क्षेत्राच्या मागे पडलो नाही. त्यासाठी काही नियम हवे. जी गुंतवणूक आहे त्यानुसार देशात प्रोडक्टिव्ह असेट्स वाढले पाहिजे, रोजगार वाढले  पाहिजे अशा खासगी गुंतवणूकीचा आम्ही कधी विरोध केला नसल्याचं त्यांनी खासगी क्षेत्राबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नमूद केलं. 

टॅग्स :GovernmentसरकारInvestmentगुंतवणूकlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड