शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

असुरक्षिततेची भावना असल्यानेच मोदी माझा द्वेष करतात - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:32 PM

मोदींचा माझ्यावरील क्रोध फक्त त्यांच्या स्वत:ची असुरक्षिततेची आणि भीतीची भावना असल्यामुळे आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे

नवी दिल्ली -  माझ्यावर वैयक्तिक टीका करणे, पप्पू म्हणून चिडवणे हे सगळे भाजपाचा माझ्यावरील क्रोध, राग आणि निराशादायी भावनेतून होत असते. पण त्यांच्या रागाला मी रागानेच उत्तर द्यावं यावर माझा विश्वास नाही. रागाने राग काढू शकत नाही, मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी मला खूप काही शिकवले आहे. विशेषकरून सहनशीलता. तुम्हाला कोणी शिकविणारा असेल तर तुम्ही त्याचा तिरस्कार कसा करू शकता? पंतप्रधान माझा द्वेष करु शकतात, पण माझ्या हृदयात केवळ त्याच्याबद्दल प्रेम आहे कारण मला माहिती आहे की, मोदींचा माझ्यावरील क्रोध फक्त त्यांच्या स्वत:ची असुरक्षिततेची आणि भीतीची भावना असल्यामुळे आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. द टेलिग्राफ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहे.

राहुल गांधी यांनी या मुलाखतीत मोदींवर टीकेच लक्ष्य केलं आहे. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी म्हटलं की, राजकारणात असलेल्या व्यक्तींनी जनतेस सशक्त करण्यासाठी स्वत:ची शक्ती वापरली पाहिजे. विशेषत समाजातील ज्या घटकांचे आवाज दाबले जात आहेत त्यांना सशक्त केले पाहिजे. भविष्यात काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच आमच्या वरिष्ठ नेत्यांची मदत झाली आहे. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात कुठेही वरिष्ठ आणि नवीन पिढीमध्ये संघर्ष नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

आगामी लोकसभा निवडणूक ही सत्तेसाठी नाही तर देशाच्या रक्षणासाठी आहे. अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था, कृषी संकट आणि मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी सामना आणि महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता, विविधता आणि बहुलवाद यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमची लढाई आहे.  सुप्रीम कोर्ट, आरबीआय आणि सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर यांच्यावर एक प्रकारचा दबाव आहे. जे अधिकारी आरएसएसच्या नियमांचे उल्लंघन करतील किंवा त्यांच्या धोरणावर टीका करतील अशा अधिकाऱ्यांना काढून टाकले जाते. सीबीआय संचालकांना मध्यरात्री पदावरुन हटविण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रिया आणि निर्णय कसे हाताळले जात आहेत याबद्दल चार न्यायाधीशांद्वारे आयोजित पत्रकार परिषद अवघ्या देशाने पाहिली आहे असं राहुल गांधी यांनी मुलाखतीत सांगितले. 

संपूर्ण भारतामध्ये लोक मोदींबद्दल नाराज आणि क्रोधित आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी राष्ट्रवाद, देशभक्ती सारख्या शब्दाचा प्रचारात वापर करत आहे. मात्र देशाचे लोक मुर्ख नाही त्यांना माहीत आहे की यांच्याकडून आपण फसवले जाणार आहोत अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

 उत्तर प्रदेशातील आघाडीबाबत काय वाटतं राहुल गांधींना ?उत्तर प्रदेशात आम्ही आशावादी होतो. पण एसपी-बीएसपीला वाटले की त्यांनी एकटे जावे. मात्र जर एसपी-बीएसपी-काँग्रेसची आघाडी झाली असती भाजपासाठी ही आघाडी विनाशकारी ठरली असती असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा