शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

'मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही घेऊ शकत नाही', अमित शाह यांचे मोठे वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 5:52 PM

विरोधकांकडून सातत्याने चीनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जातो.

Lok Sabha Election : गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. या सीमावादामुळे अनेकदा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशातच, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून चीन मोठ्या प्रमाणावर भारतीय भूमीवर कब्जा करतोय, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. पण, प्रत्येकवेळी सरकारकडून या आरोपाचे खंडन केले जाते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचा पुन्नरुच्चार केला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी(दि.9) आसाममधील लखीमपूर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून, चीन भारताची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ शकला नाही. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये चिनी हल्ल्यावेळी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला 'बाय-बाय' केले होते, हे जनता कधीही विसरू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमचा खासदार कोण असेल, कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला हवंय आणि पुढचा पंतप्रधान कोणाला करायचे, हे तुम्हाला 19 एप्रिलला ठरवावे लागेल. तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत, एका बाजूला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI आघाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे. 

यावेळी शाह यांनी राम मंदिराचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बांगलादेशची सीमा सुरक्षित करुन घुसखोरी थांबवली. आगामी काळात आसाम देशातील इतर राज्यांप्रमाणे विकसित राज्य बनेल. काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला, पण हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chinaचीनIndiaभारत