शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

शेतकरी कर्ज फेडू न शकल्यास फौजदारी गुन्हा नसेल; काँग्रेसचं ऐतिहासिक आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 1:10 PM

'हम निभाएंगे', या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला.

ठळक मुद्देशेतकरी कर्ज फेडू न शकल्यास तो फौजदारी गुन्हा नसेल, असं ऐतिहासिक आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिलं.'हम निभाएंगे', या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला.

अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्यासारखे कोट्यधीश उद्योगपती बँकेचा पैसा घेऊन पळून जातात. पण, प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास तो फौजदारी गुन्हा ठरतो. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं. परंतु, काँग्रेस सत्तेत आल्यास हा नियम रद्द केला जाईल, शेतकरी कर्ज फेडू न शकल्यास तो फौजदारी गुन्हा नसेल, असं ऐतिहासिक आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिलं. 

'हम निभाएंगे', या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या. आपले पंतप्रधान रोजच खोटं बोलत आहेत. आम्ही मात्र सत्य बोलतोय. जी शक्य होतील अशीच खरी आश्वासनं आम्ही देत आहोत, असं नमूद करत राहुल यांनी 'न्याय', रोजगार, किसान, शिक्षण आणि आरोग्य अशी पंचसूत्री मांडली. 

देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात दरवर्षी ७२ हजार रुपये जमा करण्याची घोषणा राहुल गांधींनी आधीच केली आहे. या 'न्याय' योजनेचा पुनरुच्चार करत, 'गरिबी पर वार, बहत्तर हजार', असा नारा त्यांनी आज दिला. नोटाबंदी, जीएसटीमुळे ढासळलेली देशाची अर्थव्यवस्था या ७२ हजार रुपयांमुळे उसळी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबमध्ये आम्ही शेतकरी कर्जमाफीचं वचन दिलं होतं. ते आमच्या सरकारने पूर्ण केलं आहे. केंद्रात सत्तेत आल्यास शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट मांडलं जाईल, असं राहुल यांनी सांगितलं. बँकेचं कर्ज फेडू न शकणारा शेतकरी तुरुंगात जाऊ नये, यादृष्टीने नियम बदलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के रक्कम शिक्षणासाठी खर्च केली जाईल आणि आरोग्यव्यवस्था बळकट करण्यावरही भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चौकीदार चोर आहे, हे सगळ्यांना कळून चुकलंय. त्यामुळेच जनता पुन्हा काँग्रेसकडे सत्ता सोपवेल, असंही ते ठामपणे म्हणाले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीcongressकाँग्रेस