शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

केजरीवाल म्हणाले, 'वाटलं होतं दिल्लीतील सर्व जागा जिंकू, पण ऐनवेळी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 1:56 PM

भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर यावेळी केजरीवाल यांनी आपले मत मांडले. केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुनरागमन अशक्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच विविध पक्षांकडून एकतर्फी निकाल लागणार असल्याचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे. यात आता आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा देखील समावेश झाला आहे. केजरीवाल यांनी दिल्लीतील 'आप'च्या स्थितीबद्दल सांगितले.

केजरीवाल यांच्या मते दिल्लीतील सातही जागांवर 'आप'च्या विजयाची आशा होती. मात्र ऐनवळी डाव पलटला. अखेरच्या क्षणी 'आप'ची सर्व मते काँग्रेसला शिफ्ट झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. 'आप'ला किती जागा मिळणार, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे केजरीवाल यांनी टाळले. तसेच मतदानाच्या ४८ तासांपर्यंत आम्हाला वाटले होते की, 'आप' सर्व जागा जिंकेल. मात्र ऐनवेळी सर्व मते काँग्रेसला गेली. निवडणुकीच्या एक दिवसआधी हे घडले आहे. दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसला कशी गेली याचा आम्ही शोध घेत असल्याचे देखील केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत १२-१३ टक्के मुस्लीम मते आहेत.

भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर यावेळी केजरीवाल यांनी आपले मत मांडले. केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुनरागमन अशक्य आहे. तसेच केंद्रात मोदी आणि अमित शाह यांच्या व्यतिरिक्त सरकार स्थापन झाल्यास त्याला आपण पाठिंबा देऊ परंतु, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे वचन देणाऱ्यालाच पाठिंबा देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केले.

२०१४ लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वच्या सर्व ७ जागांवर दारुण पराभव पत्करावा लागला होता. यावेळी 'आप'ने काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत युती होऊ शकली नाही. त्यानंतर काँग्रेस आणि 'आप' स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAAPआप