शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू राम, कृष्ण यासारखेच नरेंद्र मोदी दैवी अवतार; भाजपा मंत्र्यांनी सांगितले मोदी का जन्मले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:43 IST

आपल्या धर्म आणि संस्कृतीत म्हटलं आहे की, जेव्हा कधीही भारतावर कोणतं संकट येईल अथवा अत्याचार वाढेल तेव्हा दैवी अवतार जन्माला येईल असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे.

भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग देशात मोठ्या प्रमाणात आहे. २०१४ पासून देशात मोदी लाट आली आणि एकेकाळी २ जागा मिळालेल्या भाजपानं थेट केंद्रात सरकार बनवलं. २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपानं पक्ष म्हणून बहुमताचा आकडा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा करिष्मा असल्याचं बोललं जातं त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्याही वाढली. आता मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेता कमल पटेल यांनी मोदींना दैवी अवताराची उपमा देऊन टाकली आहे.

कमल पटेल म्हणाले की, देशात काँग्रेसकडून सुरु असलेला अत्याचार, भ्रष्टाचार आणि देशाच्या संस्कृती रक्षणासाठी, नैराश्य असलेले वातावरण संपुष्टात आणण्यासाठी प्रभू राम आणि कृष्णाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीही दैवी अवतार म्हणून जन्माला आलेत. सोमवारी हरदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटेल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींद्वारे करण्यात येत असलेली कार्य भारताला विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर घेऊन जात आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणं आणि लोकांचे कल्याण करणं हे सामान्य व्यक्तींकडून पूर्ण होऊ शकत नाही असं ते म्हणाले.

तसेच आपल्या धर्म आणि संस्कृतीत म्हटलं आहे की, जेव्हा कधीही भारतावर कोणतं संकट येईल अथवा अत्याचार वाढेल तेव्हा दैवी अवतार जन्माला येईल. प्रभू राम हे मनुष्य अवतारात आले होते आणि राक्षस रावणाला मारुन आणि अन्य वाईट शक्तींना हरवून लोकांची रक्षा करत रामराज्याची स्थापना केली होती. कंसचे अत्याचार वाढले म्हणून भगवान कृष्ण जन्माले आले आणि कंसची क्रूरता संपवून सर्वसामान्यांना दिलासा दिला असं कमल पटेल यांनी सांगितले.

यासाठी झाला मोदींचा जन्म

दरम्यान, अशाप्रकारेच जेव्हा काँग्रेसचा अत्याचार वाढला, भ्रष्टाचार वाढला, जातीवाद वाढला. देशाची संस्कृती नष्ट व्हायला लागली. चहुबाजूने नैराश्याचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा हे संपवण्यासाठी नरेंद्र मोदींचा जन्म झाला. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वगुरु बनणार आहे. ज्यांनी लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि सर्वसामान्यांचे कल्याण केले. हे अशक्य कार्य आहे जे साधारण मनुष्य पूर्ण करू शकत नाही. जरी शक्य असतं तरी ६० वर्ष लागली असती. त्यासाठी नरेंद्र मोदींसारख्या अवतारी पुरुषाचा जन्म झाला आणि त्यांनी हे कार्य पूर्ण केले. ते दैवी अवतार आहेत असं कमल पटेल यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी