शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयांत ५० ते ६० न्यायाधीशांच्या नियुक्तीला कायदा मंत्रालयाची मंजुरी

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

उच्च न्यायालयांत ५० ते ६० न्यायाधीशांच्या नियुक्तीला कायदा मंत्रालयाची मंजुरी

उच्च न्यायालयांत ५० ते ६० न्यायाधीशांच्या नियुक्तीला कायदा मंत्रालयाची मंजुरी
नवी दिल्ली : नव्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या (एनजेएसी) वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरील निर्णयाची प्रतीक्षा असतानाच कायदा मंत्रालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आलेल्या ५० ते ६० नावांना मंजुरी दिली आहे. विद्यमान कॉलेजियम व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही नव्या नियुक्त्या रोखून ठेवण्यात आलेल्या नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करण्याचा सरकारचा मुळीच हेतू नाही आणि ही भूमिका सरन्यायाधीशांनाही कळविण्यात आलेली आहे, असे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या संदर्भात पुरविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीवर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी कायदामंत्र्यांनी नुकतीच सरन्यायाधीशांची भेट घेतली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ५० ते ६० नावांना मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु नवी व्यवस्था स्थापन होईपर्यंत विद्यमान कॉलेजियम व्यवस्था कायम राहील. सरन्यायाधीश आणि कॉलेजियम नियुक्तीबाबतचा निर्णय घेण्यास मोकळे आहेत, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
प्रलंबित याचिकांवर निर्णय येईपर्यंत नवी व्यवस्था अमलात आणली जाऊ शकत नाही. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका सवार्ेच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. या रिट याचिका निकाली निघाल्याशिवाय आम्हाला एनजेएसीमार्फत न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा निर्णय कसा काय घेता येऊ शकेल? आयोग स्थापन होईपर्यंत कॉलेजियमची कार्यवाही रोखून धरणे हे आमचे काम नाही, असे मंत्रालयातील या सूत्रांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)