शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

Lakhimpur Kheri Incident: केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी ४ दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा...; राकेश टिकैतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 5:50 AM

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषला अटक करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

रामपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी येत्या मंगळवारी, १२ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे, तसे न झाल्यास या मुद्द्यावरून शेतकरी देशव्यापी आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेश सरकार व केंद्राला दिला आहे. 

रामपूर येथे शेतकऱ्यांच्या एका सभेत टिकैत बोलत होते. विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेश सरकार व केंद्राचा तीव्र निषेध केला होता. लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी शेतकरी काही ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषला अटक करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४५ लाख रुपये व सरकारी नोकरी तसेच जखमींना १० लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने ४ ऑक्टोबर रोजी केली होती. हा निर्णय घेण्याआधी त्या सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा केली होती. 

वरुण यांनी भाजप सोडून आंदोलन करावे -लांबा शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल भाजप नेते वरुण गांधी यांना प्रामाणिकपणे काही वाटत असेल तर त्यांनी भाजपला सोडून देऊन आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन पाठिंबा दिला पाहिजे, असे काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी म्हटले.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारrakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन