शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी काय पण! केरळच्या मुसळधार पावसात जोडपं अडकलं; टोपात बसून मंडपात पोहचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:41 IST

Kerala rains flood bride and groom use cauldron : केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - केरळमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामध्ये आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोलून सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पावसामुळे-पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाची टीम मदत कार्यात गुंतलेली आहेत. तिरुअनंतपुरम, कोल्लमसह 7 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. तर, पथानामथिट्टासह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान एका हटके लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळेच लग्नमंडपात जाणं अवघड झालं होतं. अशा वेळी या जोडप्याने एक अनोखी शक्कल लढवली आणि टोपाचा उपयोग करून मंडप गाठला. याचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

अनेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कुट्टनाड भागात राहणाऱ्या राहुल आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वीच ठरला होता. लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्व पाहुण्यांना आमंत्रणं देण्यात आलं होतं आणि कोरोनाचे नियम पाळत लग्न करण्याचं नियोजन झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अऩेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली गेले. लग्नाच्या दिवशी देखील मुसळधार पाऊस कोसळत होता. 

पुराच्या पाण्यात टोपातून लग्नमंडपात पोहोचले

रस्त्यावर कमरेएवढं पाणी होतं. त्यामुळे कोणतंही वाहन जाऊ शकत नव्हतं. अशावेळी जोडप्याने आजच लग्न करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी शक्कल लढवली. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा एक मोठा टोप घेतला. त्यात दोघंही बसले आणि पुराच्या पाण्यात पातेल्यातून लग्नमंडपात पोहोचले. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल