शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

Kerala Floods: केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी घेतली लष्कराची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:23 AM

Kerala Floods: कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात भूस्खलनानंतर 22 जण बेपत्ता झाल्याची भीती आहे.

कोट्टायम/इडुकी: शनिवारपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत दक्षिण आणि मध्य केरळमध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात भूस्खलनानंतर 22 जण बेपत्ता झाल्याची भीती आहे. पावसामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती पाहता सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आजही अतिवृष्टीचा इशारामुसळधार पावसामुळे केरळच्या इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. हवामान विभागाने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्रावणकोर देवासम मंडळाने भगवान अयप्पाच्या भक्तांना 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी सबरीमाला मंदिरात न जाण्याचे आवाहन केलं आहे. तिकडे राज्यातील पंबा नदीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीपर्यंत वाढत आहे.

मुख्यमंत्र्यांची आपात्कालीन बैठककेरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता शनिवारी रात्री तातडीची बैठक बोलावली. बैठकीदरम्यान ते म्हणाले की राज्याच्या काही भागात परिस्थिती खरोखर गंभीर आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली आहे. जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की हे तीन जिल्हे मुसळधार पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

पाच जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कोट्टायम आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. 

टॅग्स :KeralaकेरळRainपाऊसlandslidesभूस्खलन