शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

'मागची 5 वर्षं आधार लिंक करण्यात गेली; आता पुढची 5 वर्षं जन्मदाखले मिळवण्यात जातील'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 5:32 PM

Citizen Amendment Bill : नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन मोदी सरकार लक्ष्य

पाटणा: जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारनं नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. कन्हैयानं दोन ट्विट करुन सरकारवर तोफ डागली आहे. देशातलं राष्ट्रवादी सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार-आठ आण्याला विकून टाकेल, अशा शब्दांत कन्हैयानं सरकारवर टीका केली आहे.  कन्हैयानं त्याच्या पहिल्या ट्विटमधून सार्वजनिक क्षेत्राचं खासगीकरण, शिक्षण आणि रोजगारांवर भाष्य केलं आहे. 'मागील ५ वर्षे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यात गेली. आता पुढील ५ वर्ष आजोबांच्या आजोबांचे जन्मदाखले तयार करण्यात जातील. याच काळात राष्ट्रवादी सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार-आठ आण्यात विकेल आणि ट्रेनच्या तिकीटापासून महाविद्यालयाच्या पदवीपर्यंत सर्व काही गरिबांच्या आवाक्याबाहेर जाईल,' असं कन्हैयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.  दुसऱ्या ट्विटमधूनही कन्हैया कुमारनं खासगीकरणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 'देशवासीयांना कागदपत्रं मिळवण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लागतील. या सर्व गदारोळात ओएनजीसी, बीएसएनएल, एअर इंडिया, रेल्वेची विक्री झालेली असेल. त्यानंतर खासगी तेजस एक्स्प्रेसमधून ४०० रुपयांऐवजी ४००० रुपयांचं तिकीट काढून प्रवास करावा लागेल आणि १० लाख रुपये खर्च करुन पदवी घेतलेला तरुण १० हजार रुपये महिना पगाराची नोकरी करेल,' अशा शब्दांमध्ये कन्हैयानं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा