शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 9:02 AM

गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी स्थानिक तरुणांचे दहशतवादी गटांमध्ये भरतीचे होण्याचे प्रमाण आतापर्यंत सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा केला आहे. गेल्या 45 दिवसांत फक्त दोन जण दहशतवादी गटांमध्ये सामील झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि सीमा सुरक्षा दल यांच्यासह अनेक यंत्रणांनी केलेल्या मूल्यमापनानंतर घुसखोरी केलेल्या विदेशी दहशतवाद्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. श्रीनगर परिसरात अनेक ठिकाणी दहशतवादी आढळून आले आहेत. तसेच ते उघडपणे परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्यांना दुकाने बंद ठेवण्यास आणि त्यांचा आदेश पाळण्यास सांगत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्तानने 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे भारताने प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असे आवाहन भारताकडून करण्यात आले होते. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी