शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर रुग्णसंख्या वाढली : केळी व कांद्याला फटका तर गहू, हरभर्‍याला लाभदायक

By admin | Updated: January 22, 2016 00:09 IST

जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्‍याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्‍या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्‍याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्‍या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणारे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेर गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे.
आठ दिवसात पाच सेल्सीअसने पारा घसला
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थंडीचा जोर कायम होता. त्यानंतर जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत उन्हाचे चटके जाणवू लागले. मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होऊन उन्हाचा तडाका जाणवायला सुरुवात होते. मात्र १६ तारखेपासून उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या दरम्यान तापमाचा पारा किमान पाच सेल्सीअस अंशानी घसरला आहे.
वातावरण बदलामुळे रुग्णसंख्या वाढली
जानेवारीच्या पंधरवड्यात उष्ण आणि त्यापाठोपाठ थंड हवामानामुळे सर्दी व तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे. फ्ल्यू, मलेरिया तसेच हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरण बदलामुळे घश्याच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
केळी व कांद्याच्या पिकाला फटका
या थंडीचा केळी आणि कांद्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगासाठी हे वातावरण लाभदायक असल्याने केळीवर करपा व सरका या रोगाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. तर कांद्यावरदेखील करपा रोगाचा प्रार्दुभाव असण्याची शक्यता आहे. करपा व सरका या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी बुरशीनाशकाची फवारणी करावी असे तज्ज्ञांनी सुचविले आहे. वाढत्या थंडीचा गहू व हरभर्‍यासह कोरडवाहू पिकांना मात्र चांगला लाभ होणार आहे. यावर्षी जिल्‘ात अत्यल्प पाऊस झाल्याने गव्हाचे क्षेत्र केवळ २० हजार हेक्टरवर आहे. थंडीमुळे जमिन ओलसर राहणार असल्याने त्याचा लाभ गव्हाला होणार आहे. यासह रब्बी ज्वारीलादेखील याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्‘ातील तापमान

जळगाव८
भुसावळ८
अमळनेर११
बोदवड११
भडगाव११
चोपडा८
चाळीसगाव९
धरणगाव११
एरंडोल१०
फैजपूर१२
जामनेर८
मुक्ताईनगर१२
पारोळा१२
पाचोरा११
रावेर१२
सावदा१२
वरणगाव१२
यावल८