शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जय श्रीराम! बंगालमध्ये ममता आणि भाजपाच्या लढाईत पोस्ट खात्याचं वाढलं काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 11:11 AM

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. ममता बॅनर्जींसमोर जय श्रीराम म्हटल्याने काही जणांवर कारवाई केली गेल्याच्या निषेधार्थ भाजपाने ममता बॅनर्जींना जय श्रीराम असा उल्लेख असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर तृणमूल काँग्रेसकडून जय हिंद जय बांगला या घोषवाक्याद्वारे जय श्रीरामला प्रत्युत्तर दिले जात आहे.पण दोन्ही पक्षांमध्ये पत्रांद्वारे सुरू असलेल्या शीतयुद्धात पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांची मात्र पळापळ होत आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात जय श्रीराम हा नारा देण्यास सुरुवात केली होती. अगदी समोरासमोर या घोषणा दिल्या गेल्याने ममता बॅनर्जी यांचा तीळपापड झाल्याचेही अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान, सध्या ममता बॅनर्जींच्या पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पत्रे पाठवण्यात येत असल्याने ममता बॅनर्जींचे निवासस्थान असलेल्या दक्षिण कोलकात्यामधील कालीघाट पोस्ट ऑफीसमध्ये दररोज हजारो पत्रांचा ढीग जमत आहे. पोस्ट खात्यामधील कर्मचाऱ्यांसाठी पोस्टकार्ड हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे प्रत्येक पत्राला कर्मचाऱ्यांकडून सुनियोजित पद्धतीने हाताळले जाते. दरम्यान, पोस्ट ऑफीसमधील सूत्रांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांना सरासरी 30 ते 40 पत्रे आणि रजिस्टर पत्रे येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांना येणाऱ्या पत्रांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या ममता बॅनर्जींना येणाऱ्या पत्रांची संख्या ही या पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या एकूण पत्रसंख्येपैकी दहा टक्के आहे.  दरम्यान, ममता बॅनर्जींच्या नावे येणारी पत्रे त्यांच्या निवासस्थानी पोच करण्यासाठी खास एका पोस्टमनची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पोस्टमन ही पत्रे घेऊन रोज ममतांच्या निवासस्थानी येतो आणि संबंधित व्यक्तिकडे देऊन निघून जातो, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, रेल्वे मेल सर्व्हिसनेसुद्धा ममता बॅनर्जींसाठी आलेली सुमारे 4 हजार 500 पत्रे वेगळी केली आहेत. तसेच या प्रकारामुळे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जीं संतप्त झाल्या असून, त्यांच्याकडूनही पोस्ट कार्डला पोस्ट कार्डने प्रत्युत्तर देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. जय श्रीराम ऐवजी जय हिंद, जय बांगला असे उल्लेख असलेली पोस्टकार्ड तृणमूलकडून नरेंद्र मोदींना पाठवण्यातच येत आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण