शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

'जय श्रीराम' चा बंगाली संस्कृतीशी काहीही संबंध नाही - अमर्त्य सेन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 11:20 AM

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम हा वादाचा मुद्दा बनला असून, या वादात आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजककीय वातावरण कमालीचे तापले होते. त्यातच बंगालमध्ये मुसंडी मारण्याच्या इराद्याने उतरलेल्या भाजपाने जय श्रीराम हा नारा देत बंगालमधील सत्ताधार असलेल्या तृणमूल काँग्रेसला जेरीस आणले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम हा वादाचा मुद्दा बनला असून, या वादात आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे. जय श्रीराम या घोषणेचा बंगाली संस्कृतीशी काहीही  संबंध नाही. या घोषणेचा वापर केवळ लोकांना मारहाण करण्यासाठी होत आहे, असा आरोप अमर्त्य सेन यांनी केला आहे. शुक्रवारी जादवपूर विद्यापीठामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अमर्त्य सेन यांनी जय श्रीराम या घोषणेवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. ''आता कोलकात्यामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतो. पूर्वी तो होत नसे. सध्या जय श्रीराम ही घोषणा लोकांना मारहाण करण्यासाठी उपयोगात आणली जात आहे.'' दरम्यान, जय श्रीराम या घोषणेचा वापर भाजपाकडून सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपाकडून जय श्रीराम या घोषणेचा प्रभावी वापर करण्यात आला होता. तसेच काही ठिकाणी जय श्रीराम अशी घोषणा देणाऱ्यांविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली होती.  अमर्त्य सेन यांनी पुढे सांगितले की, ''एकदा मी माझ्या चार वर्षीय नातीला विचारले की, तुझी आवडती देवी कोण आहे. त्यावर तिने दुर्गा माता असे उत्तर दिले. बंगालमध्ये दुर्गा मातेला जे महत्त्व आहे त्याची तुलना रामनवमीशी होऊ शकत नाही. दुर्गामाता आमच्या जीवनात उपस्थित आहे. तर जय श्रीराम सारख्या घोषणा केवळ लोकांवर हल्ला करण्यासाठी आडोसा म्हणून दिल्या जातात असे मला वाटते.''  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणBJPभाजपाtmcठाणे महापालिका