शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Indira Gandhi Birth Anniversary - ...अन् इंदिरा गांधींना 'दुर्गा' हे विशेषण जोडलं गेलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 8:54 AM

इंदिरा गांधी यांनी 1971 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली.

नवी दिल्ली - देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. एक कणखर नेत्या, 'आयर्न लेडी' म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते. त्यामुळे अनेक कठोर प्रसंगांना इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले होते. मात्र, इंदिराजींच्या याच धाडसी बाण्याचे कौतुक अनेक वर्षं होत आहे.

इंदिरा गांधी यांनी 1971 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली. पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांग्लादेश अस्तित्वात आला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे हे यश अद्वितीय होते. त्यानंतर त्या 'दुर्गा' म्हणूनच प्रसिद्ध झाल्या. त्यांना ही उपमा अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्याचं काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं होतं, परंतु वाजपेयींनी वारंवार त्याचं खंडन केलं होतं. 1971 च्या युद्धातील विजयाबद्दल मी इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली होती. तथापि, त्यांना दुर्गेची उपमा दिली नव्हती, असा खुलासा त्यांनी एका कार्यक्रमात केला होता. तसंच, वाजपेयी यांचे सर्वात जवळचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘मेरा देश, मेरा जीवन’ या आपल्या आत्मचरित्रातही याबाबत स्पष्टीकरण केलंय. इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा वाजपेयी यांनी नव्हे, तर अन्य एका सदस्याने दिली होती, असे अडवाणी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.  

त्याकाळी संसदेतील कामकाजाच्या रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड होऊ शकलेले नाही, पण दुर्गा हे विशेषण इंदिरा गांधींच्या नावापुढे कायमचं जोडलं गेलं आहे.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी