शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

२०३० पर्यंत भारतीय रेल्वे होणार १०० टक्के उत्सर्जनमुक्त -पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 05:04 IST

गोयल यांनी तीनदिवसीय ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेत ३0 देशांतील ५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे २०३० पर्यंत जगातील पहिली १०० टक्के हरित रेल्वे बनेल. आपल्या रेल्वेचे शुद्ध उत्सर्जन (नेट एमिशन) शून्यावर आलेले असेल, असे प्रतिपादन वाणिज्य व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.गोयल यांनी तीनदिवसीय ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेत ३0 देशांतील ५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले. ७५ सत्रांत जगातील २५० वक्त्यांनी परिषदेला संबोधित केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारत पुन्हा एकदा क्रियाशील होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आम्ही नेहमीच जलद गतीने पूर्ववत होण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. यावेळीही हेच दिसून येत आहे. कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या संकटातूनभारतीय अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. तथापि, प्रत्येक आव्हान भारताने यशस्वीरीत्या पेलले आहे. प्रत्येक संकटातून भारत फार जलद गतीने सावरला आहे. प्रत्येकवेळी तो अत्यंत वेगाने सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. याहीवेळी भारताच्या याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेच्या १०० टक्के विद्युतीकरणास मंजुरी दिली आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठी रेल्वे आहे. विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वे जगातील पहिली १०० टक्के हरित रेल्वे असेल. भारतीय रेल्वेचे शुद्ध-उत्सर्जन शून्य असेल. विशेष म्हणजे १०० टक्के उत्सर्जनमुक्त असलेली भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठी रेल्वेही असेल, असे गोयल यांनी या परिसंवादात सांगितले.शंभर टक्के विद्युतीकरणाची योजना- १,२०,०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रेल्वेमार्ग भारतात आहेत. हे सर्व रेल्वेमार्ग १00 टक्के विद्युतीकृत करण्याची सरकारची योजना आहे. पंतप्रधानांनी या प्रकल्पास मान्यता दिली आहे.- आमच्या नियोजनानुसार, २०३० पर्यंत विद्युतीकरणाचा हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. सर्व मार्गांचे विद्युतीकरण तोपर्यंत पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे