शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 10:18 AM

चीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

ठळक मुद्देचीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्यचर्चेतून तोडगा निघण्याचा सिंह यांचा विश्वास

जोवर चीन सीमेवर आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही, असं रोखठोक उत्तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. यावेळी त्यांनी भारत-चीनदरम्यान असलेल्या वादावर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो असा विश्वासही व्यक्त केला. भारत आपल्या सीमाक्षेत्रात तेजीनं पायाभूत सुविधांचा विकास करत आहे आणि चीननं काही योजनांवर आक्षेपही घेतला असल्याचं सिंह म्हणाले. "जोवर चीन आपल्या सैनिकांची संख्या कमी करत नाही. तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू करणार नाही," असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. "सध्या सुरू असलेल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कोणती वेळेची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही, यासाठी तुम्ही वेळेची मर्यादा ठरवू शकत नाही. आम्हाला चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अरूणाचल प्रदेशात चीननं गाव वसवल्याच्या वृत्तावरही भाष्य केलं. "हा परिसर सीमेच्या अतिशय जवळ आहे आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा अनेक वर्षांच्या कालावधीत विकसित करण्यात आल्या आहेत," असंही ते म्हणाले. भारत आणि चीन या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध गेल्या चार दशकांच्या किमान स्तरावर आहेत आणि चीननं भारताच्या विश्वासाला तडा दिला आहे का असा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारण्यात आला. "चीननं भारताचा विश्वास तोडला आहे यात कोणतीही शंका नाही," असं उत्तर सिंह यांनी यावेळी दिलं. यावेळी त्यांनी सैन्य स्तरावर चर्चेच्या पुढील फेरीता संदर्भ देताना चीननं अलिकडेच १९ जानेवारी रोजीचा चर्चेचा प्रस्ताव ठेवला असल्याचं सांगितलं. "चर्चेच्या एका दिवसांपूर्वीच आम्हाला याची माहिती मिळाली होती. म्हणूनच आम्ही ही चर्चेची फेरी २३ किंवा २४ जानेवारी रोजी पुन्हा निश्चित करण्यास सांगितलं. भारत कायमच चर्चेसाठी तयार असतो," असंही सिंह म्हणाले.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनBorderसीमारेषाinterviewमुलाखत