शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त होईल, स्मृती इराणींची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 9:08 PM

आम आदमी पक्षाचे नेते खासदार सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता.

नवी दिल्ली - महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत बोलताना, देशातील कुपोषणासंदर्भात चर्चा केली. तसेच, 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त देश होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक ड्रीम प्रोजेक्टपैकी 'पोषण अभियान योजना' हा एक महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचं उद्दिष्ट असल्याचंही इराणी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं. 

आम आदमी पक्षाचे नेते खासदार सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना स्मृती इराणी यांनी पोषण अभियान योजनेसंदर्भात माहिती दिली. जेव्हा आपण कुपोषणाबाबत वाच्यता करतो, तेव्हा सॅनिटेशन, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि इतरही काही फॅक्टर्ससंदर्भात चर्चा केली जाते. पोषण अभियान जलद गतीने कार्यरत होत आहे. त्यामुळे 2022 पर्यंत देशात एकही मुल कुपोषणग्रस्त राहणार नाही. देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे अभियान कार्यरत आहे. पोषण अभियानाची सुरुवात केली, तेव्हा 25 कोटी नागरिक या अभियानासोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर, 8 ते 22 मार्च या कालावधीत पोषण पखवाडा साजरा करण्यात आला. त्यावेळी 44 कोटी 88 लाख लोकांनी सहभागी होत या योजनेला एक आंदोलन बनवल्याचं पाहायला मिळालं. शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या मिड डे मीलसंदर्भात स्मृती यांनी माहिती दिली. शाळेतील मध्यान्य भोजन अधिक चांगल देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य सृदृढ राहिल, असेही स्मृती इराणी यांनी सांगितले.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदी