शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर - शक्तिकांत दास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 8:45 AM

वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले.

नवी दिल्ली :भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे बसलेल्या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत असल्याच्या पार्श्वभूमीवर दास यांनी हे वक्तव्य केले आहे.वित्तीय आयोगाचे चेअरमन एन.के. सिंग यांनी लिहिलेल्या ‘पोर्ट्रेट ऑफ पॉवर : हाफ अ सेंच्युरी बीइंग अ‍ॅट रिंगसाईड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी दास यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक व सरकारकडून समावेशी (अ‍ॅकामॉडेटिव्ह) पतधोरण आणि वित्तीय धोरण स्वीकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता आर्थिक पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या ऐन उंबरठ्यावर उभे आहोत.वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले. कोविडपश्चात काळात देशाने वाटचाल करावी यासाठी सरकारने वित्तीय नकाशा (रोडमॅप) तयार करावा. या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था