शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 20:41 IST

स्पेशल फोर्सेसच्या या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भातही पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. भारतात 12 हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत.

ठळक मुद्देभारताने लडाख सीमेवर स्पेशल फोर्सेस तैनात केल्या आहेत. स्पेशल फोर्सेसनी 2017मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.आवश्यकता वाटलीच, तर यांचा उपयोग चीन विरोधातही केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली - लडाख सीमेवर भारत-चीन तणाव प्रचंड वाढला आहे. आता भारतानेलडाख सीमेवर स्पेशल फोर्सेस तैनात केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागांतून पॅरा स्पेशल फोर्सच्या युनिट लडाखमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. येथे त्यांचा सरावही सुरू आहे. स्पेशल फोर्सेसनी 2017मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. एवढेच नाही, तर सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, आवश्यकता वाटलीच, तर यांचा उपयोग चीन विरोधातही केला जाऊ शकतो.

स्पेशल फोर्सेसच्या या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भातही पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. भारतात 12 हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत. ज्या भारताच्या वेगवेगळ्या भागांत प्रशिक्षण घेतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात स्पेशल फोर्सेसच्या तुकड्या लेहमध्ये आणि त्याच्या जवळपास उंचीच्या भागांत नियमितपणे युद्धसराव करत असतात.

भारत आणि चीन यांच्यातील तणावाला मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंत तो अधिक वाढला आहे. या झटापटीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. तर चीनने त्यांच्या मारल्या गेलेल्या सैनिकांसंदर्भात अद्याप आकडा जारी केलेला नाही. मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या झचापटीत चीनचे 35 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. 

भारत आणि रशियात 33 लढाऊ विमानांची डील -चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 33 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 18 हजार 148 कोटी रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या डीलनुसार भारत रशियाकडून सुखोई-30 आणि मिग-29 ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. ही एकूण 33 लढाऊ विमाने असणार असून यामध्ये 12 सुखोई-30 आणि 21 मिग-29 विमाने आहेत. याशिवाय भारताकडे असलेल्या रशियन  लढाऊ विमानांना अद्ययावत करण्यात येणार आहे. ही मिग 29 ची 59 विमाने आहेत. 

अॅप बंद करून चीनला हादरा -लडाखच्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आले. तर चीनच्या 35हून अधिक सैनिकांना भारतीय लष्कराने ठार केले. त्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर चीनला धक्का देण्यासाठी मोदी सरकारने चीनच्या 59 अॅपवर बंदी घातली. मोदी सरकारच्या या कारवाईनंतर चीनला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!

भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानladakhलडाख