शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्राला अर्पण, वसाहतवादी कायद्याच्या अंताचे प्रतीक: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:14 IST

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हे ते तीन क्रांतिकारी कायदे आहेत.

चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्राला समर्पित केली. गेल्या १ जुलै रोजी ब्रिटिशकालीन कायद्दे रद्द करून हे कायदे लागू करण्यात आले आहेत. तिन्ही कायद्यांची १०० टक्के अंमलबजावणी करणारे चंदीगड ही देशातील पहिली प्रातिनिधिक प्रशासकीय संस्था ठरली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी म्हणजे समस्त भारतीयांच्या हितासाठी राज्यघटनेत समाविष्ट आदर्श साकार करण्याच्या दृष्टीने एक ठोस ल असल्याचे मोदी यांनी नमूद केले. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हे ते तीन क्रांतिकारी कायदे आहेत.

भारतीय फौजदारी प्रणाली सर्वोच्च 

■ यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, आपली फौजदारी न्याय प्रणाली जगात सर्वात आधुनिक व सर्वोच्च आहे. 

■ याची शंभर टक्के अंमलबजावणी करून चंडीगडने आदर्श निर्माण केला त्याचे त्यांनी नमूद केले.

वसाहतवादी युगातील कायद्यांचा अंत

हे नवीन फौजदारी कायदे म्हणजे वसाहतवादाच्या युगातील कायद्याच्या अंताचे प्रतीक असल्याचे मोदी यांनी सांगितले.

इंग्रजांच्या राजवटीदरम्यान हेच २ कायदे जनतेवरील अत्याचार आणि शोषणाचे माध्यम होते. १८५७च्या उठावाने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला आणि लगेच १८६० मध्ये त्यांनी भारतीय दंड संहिता व इतर कायदे आणले.

भारतीयांना शिक्षा करून 3 गुलामीत ठेवणे हा या कायद्यांचा उद्देश होता, असेही मोदी म्हणाले.

पुरावे आणि जबाब नोंदविण्याची माहिती

चंडीगड पोलिसांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित प्रदर्शनात पुरावे मिळविणे आणि जबाब नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती सादर केली. 

■ नव्या कायद्यांच्या व्यावहारिक स्वरूपात लागू करण्याच्या प्रक्रियेचे स्वरूपही यात समजावून सांगण्यात आले.

■ याबाबत चंडीगडच्या ज्येष्ठ पोलिस अधीक्षक कंवरदीप कौर यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली.

हे आहे नव्या फौजदारी कायद्यांचे महत्त्व 

■ ही कायदादुरुस्ती म्हणजे भारतीय फौजदारी न्याय प्रणालीतील ऐतिहासिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. 

■ सायबर गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारीसारख्या आधुनिक आव्हानांना पेलण्याची या कायद्यांत क्षमता.

■ अशा गुन्हेगारीतील पीडितांना न्याय देण्यासाठी एक भक्कम रचना या कायद्यांच्या रूपाने तयार झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी