शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्राला अर्पण, वसाहतवादी कायद्याच्या अंताचे प्रतीक: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:14 IST

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हे ते तीन क्रांतिकारी कायदे आहेत.

चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्राला समर्पित केली. गेल्या १ जुलै रोजी ब्रिटिशकालीन कायद्दे रद्द करून हे कायदे लागू करण्यात आले आहेत. तिन्ही कायद्यांची १०० टक्के अंमलबजावणी करणारे चंदीगड ही देशातील पहिली प्रातिनिधिक प्रशासकीय संस्था ठरली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी म्हणजे समस्त भारतीयांच्या हितासाठी राज्यघटनेत समाविष्ट आदर्श साकार करण्याच्या दृष्टीने एक ठोस ल असल्याचे मोदी यांनी नमूद केले. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हे ते तीन क्रांतिकारी कायदे आहेत.

भारतीय फौजदारी प्रणाली सर्वोच्च 

■ यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, आपली फौजदारी न्याय प्रणाली जगात सर्वात आधुनिक व सर्वोच्च आहे. 

■ याची शंभर टक्के अंमलबजावणी करून चंडीगडने आदर्श निर्माण केला त्याचे त्यांनी नमूद केले.

वसाहतवादी युगातील कायद्यांचा अंत

हे नवीन फौजदारी कायदे म्हणजे वसाहतवादाच्या युगातील कायद्याच्या अंताचे प्रतीक असल्याचे मोदी यांनी सांगितले.

इंग्रजांच्या राजवटीदरम्यान हेच २ कायदे जनतेवरील अत्याचार आणि शोषणाचे माध्यम होते. १८५७च्या उठावाने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला आणि लगेच १८६० मध्ये त्यांनी भारतीय दंड संहिता व इतर कायदे आणले.

भारतीयांना शिक्षा करून 3 गुलामीत ठेवणे हा या कायद्यांचा उद्देश होता, असेही मोदी म्हणाले.

पुरावे आणि जबाब नोंदविण्याची माहिती

चंडीगड पोलिसांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित प्रदर्शनात पुरावे मिळविणे आणि जबाब नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती सादर केली. 

■ नव्या कायद्यांच्या व्यावहारिक स्वरूपात लागू करण्याच्या प्रक्रियेचे स्वरूपही यात समजावून सांगण्यात आले.

■ याबाबत चंडीगडच्या ज्येष्ठ पोलिस अधीक्षक कंवरदीप कौर यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली.

हे आहे नव्या फौजदारी कायद्यांचे महत्त्व 

■ ही कायदादुरुस्ती म्हणजे भारतीय फौजदारी न्याय प्रणालीतील ऐतिहासिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. 

■ सायबर गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारीसारख्या आधुनिक आव्हानांना पेलण्याची या कायद्यांत क्षमता.

■ अशा गुन्हेगारीतील पीडितांना न्याय देण्यासाठी एक भक्कम रचना या कायद्यांच्या रूपाने तयार झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी