शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्राला अर्पण, वसाहतवादी कायद्याच्या अंताचे प्रतीक: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:14 IST

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हे ते तीन क्रांतिकारी कायदे आहेत.

चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्राला समर्पित केली. गेल्या १ जुलै रोजी ब्रिटिशकालीन कायद्दे रद्द करून हे कायदे लागू करण्यात आले आहेत. तिन्ही कायद्यांची १०० टक्के अंमलबजावणी करणारे चंदीगड ही देशातील पहिली प्रातिनिधिक प्रशासकीय संस्था ठरली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी म्हणजे समस्त भारतीयांच्या हितासाठी राज्यघटनेत समाविष्ट आदर्श साकार करण्याच्या दृष्टीने एक ठोस ल असल्याचे मोदी यांनी नमूद केले. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम हे ते तीन क्रांतिकारी कायदे आहेत.

भारतीय फौजदारी प्रणाली सर्वोच्च 

■ यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, आपली फौजदारी न्याय प्रणाली जगात सर्वात आधुनिक व सर्वोच्च आहे. 

■ याची शंभर टक्के अंमलबजावणी करून चंडीगडने आदर्श निर्माण केला त्याचे त्यांनी नमूद केले.

वसाहतवादी युगातील कायद्यांचा अंत

हे नवीन फौजदारी कायदे म्हणजे वसाहतवादाच्या युगातील कायद्याच्या अंताचे प्रतीक असल्याचे मोदी यांनी सांगितले.

इंग्रजांच्या राजवटीदरम्यान हेच २ कायदे जनतेवरील अत्याचार आणि शोषणाचे माध्यम होते. १८५७च्या उठावाने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला आणि लगेच १८६० मध्ये त्यांनी भारतीय दंड संहिता व इतर कायदे आणले.

भारतीयांना शिक्षा करून 3 गुलामीत ठेवणे हा या कायद्यांचा उद्देश होता, असेही मोदी म्हणाले.

पुरावे आणि जबाब नोंदविण्याची माहिती

चंडीगड पोलिसांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित प्रदर्शनात पुरावे मिळविणे आणि जबाब नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती सादर केली. 

■ नव्या कायद्यांच्या व्यावहारिक स्वरूपात लागू करण्याच्या प्रक्रियेचे स्वरूपही यात समजावून सांगण्यात आले.

■ याबाबत चंडीगडच्या ज्येष्ठ पोलिस अधीक्षक कंवरदीप कौर यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली.

हे आहे नव्या फौजदारी कायद्यांचे महत्त्व 

■ ही कायदादुरुस्ती म्हणजे भारतीय फौजदारी न्याय प्रणालीतील ऐतिहासिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. 

■ सायबर गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारीसारख्या आधुनिक आव्हानांना पेलण्याची या कायद्यांत क्षमता.

■ अशा गुन्हेगारीतील पीडितांना न्याय देण्यासाठी एक भक्कम रचना या कायद्यांच्या रूपाने तयार झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी