शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

निर्भयाच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या; राज्यसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 05:52 IST

निभर्याच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आप खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत केली.

नवी दिल्ली : निभर्याच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आप खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत केली. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींची फाशी प्रलंबित आहे. आता राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप करावा, असे संजय सिंह म्हणाले.

सभापती व्यंकय्या नायडू यांनीदेखील या संवेदनशील मुद्यावर न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हायला हवी, असे म्हटले.चारही आरोपींना शिक्षा झाली आहे. अद्याप फाशी मात्र झालेली नाही. अनेक जण या मुद्यावर राजकारण करीत असल्याची टीकाही संजय सिंह यांनी केली. निर्भया प्रकरणानंतर २०१२ साली संपूर्ण देश रस्त्यावर आला. अद्यापही मृत निर्भया व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळला नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फाशीच्या अंमलबजावणीत राज्य सरकार आडकाठी करीत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सभागृहात उपस्थित आपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.

संरक्षण विभागामुळे विकास रखडला

संरक्षण विभागाच्या जागेवर बांधकामासाठी मुबंई उच्च न्यायालयाने गेल्या दोन वर्षांपासून सूचना दिल्यानंतरही नियमावली तयार नसल्याची तक्रार खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. संरक्षण मंत्रालयाने नियम करणे गरजेचे होते. ते न झाल्याने देशात अनेक ठिकाणी बांधकाम ठप्प झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र, त्यामुळे सरकारी अधिकारी विकासकामांना रोखू शकत नाही, असेही शेवाळे म्हणाले.

बेरोजगारीचे आव्हान

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची चर्चा सुरू असताना अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून किती जण भारतात आले, याची संख्या एकदाही सरकारने सांगितली नाही. सीएए, एनआरसी नव्हे तर बेरोजगारीच भारतासमोरची सर्वात मोठी समस्या आहे, असे शिवसेना गटनेते विनायक राऊत यांनी सरकारला सुनावले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राऊत यांनी सरकारला घेरले.

हिंगणघाटमधील घटनेचे लोकसभेत पडसाद

वर्धा जिल्ह्यातील युवतीस जिवंत जाळण्याच्या अमानवीय घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले. खासदार नवनीत राणा यांनी सभागृहाचे लक्ष या घटनेकडे वेधले. त्या म्हणाल्या, हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात युवतीवर पेट्रोल टाकून तिला पेटवण्यात आले. मध्यमवर्गीय कुटुंबातील ती युवती मृत्यूशी झुंज देत आहे. आम्ही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ म्हणतो; पण बाहेर मुली सुरक्षित नाहीत. अशा घटना रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षित वाटेल, असा कठोर कायदा करावा.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीPoliceपोलिसGovernmentसरकारIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र