शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

निर्भयाच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या; राज्यसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 05:52 IST

निभर्याच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आप खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत केली.

नवी दिल्ली : निभर्याच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आप खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत केली. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींची फाशी प्रलंबित आहे. आता राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप करावा, असे संजय सिंह म्हणाले.

सभापती व्यंकय्या नायडू यांनीदेखील या संवेदनशील मुद्यावर न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हायला हवी, असे म्हटले.चारही आरोपींना शिक्षा झाली आहे. अद्याप फाशी मात्र झालेली नाही. अनेक जण या मुद्यावर राजकारण करीत असल्याची टीकाही संजय सिंह यांनी केली. निर्भया प्रकरणानंतर २०१२ साली संपूर्ण देश रस्त्यावर आला. अद्यापही मृत निर्भया व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळला नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फाशीच्या अंमलबजावणीत राज्य सरकार आडकाठी करीत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सभागृहात उपस्थित आपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.

संरक्षण विभागामुळे विकास रखडला

संरक्षण विभागाच्या जागेवर बांधकामासाठी मुबंई उच्च न्यायालयाने गेल्या दोन वर्षांपासून सूचना दिल्यानंतरही नियमावली तयार नसल्याची तक्रार खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. संरक्षण मंत्रालयाने नियम करणे गरजेचे होते. ते न झाल्याने देशात अनेक ठिकाणी बांधकाम ठप्प झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र, त्यामुळे सरकारी अधिकारी विकासकामांना रोखू शकत नाही, असेही शेवाळे म्हणाले.

बेरोजगारीचे आव्हान

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची चर्चा सुरू असताना अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून किती जण भारतात आले, याची संख्या एकदाही सरकारने सांगितली नाही. सीएए, एनआरसी नव्हे तर बेरोजगारीच भारतासमोरची सर्वात मोठी समस्या आहे, असे शिवसेना गटनेते विनायक राऊत यांनी सरकारला सुनावले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राऊत यांनी सरकारला घेरले.

हिंगणघाटमधील घटनेचे लोकसभेत पडसाद

वर्धा जिल्ह्यातील युवतीस जिवंत जाळण्याच्या अमानवीय घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले. खासदार नवनीत राणा यांनी सभागृहाचे लक्ष या घटनेकडे वेधले. त्या म्हणाल्या, हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात युवतीवर पेट्रोल टाकून तिला पेटवण्यात आले. मध्यमवर्गीय कुटुंबातील ती युवती मृत्यूशी झुंज देत आहे. आम्ही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ म्हणतो; पण बाहेर मुली सुरक्षित नाहीत. अशा घटना रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षित वाटेल, असा कठोर कायदा करावा.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीPoliceपोलिसGovernmentसरकारIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र