शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

'पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 10:33 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं असल्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्देपाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं - रामदास आठवले'जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानच्या हिताचा विचार करत असतील तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा.''गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीरचा एक तृतीयांश भाग गिळंकृत केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे.'

चंदीगड - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं असल्याचं म्हटलं आहे. 'पाकव्याप्त काश्मीर पाकिस्ताननेभारताला सोपवणे हे पाकिस्तानच्या हिताचं आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानच्या हिताचा विचार करत असतील तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा' असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

'पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानसोबत राहायचं नाही. गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीरचा एक तृतीयांश भाग गिळंकृत केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे' असं आठवले यांनी म्हटलं आहे. चंदीगड येथे खात्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी असं म्हटलं आहे. 'नरेंद्र मोदी हे धाडसी पंतप्रधान आहेत. कलम 370 रद्द करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. पाकिस्तानने अनेकदा काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने आता भारताला पाकव्याप्त काश्मीर सोपवला पाहिजे आणि ते पाकिस्तानच्या हिताचं असेल' असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

रामदास आठवले यांनी 'पाकिस्तानने जर पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपवला तर आम्ही त्या ठिकाणी उद्योगधंदे उभारू. तसेच पाकिस्तानलाही व्यापारात मदत करू. भारत त्यांना गरिबी आणि बेरोजगारीशी लढण्यासही मदत करेल' असंही म्हटलं आहे. हरियाणामध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य करताना त्यांनी आपला पक्ष 90 पैकी 10 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे. 

'वंचित'पासून फारकत घेतलेल्या एमआयएमचे रामदास आठवलेंकडून स्वागत!

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर मुस्लीम आणि दलित मतांना सोबत घेऊन राज्याच्या राजकारणात नवीन आघाडी उदयाला आणतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, त्यांच्या या इराद्याला विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरंग लागल्याचे चित्र आहे. लोकसभेला सोबत लढलेला एमआयएमने वंचितपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या या निर्णयाचे आरपीआय नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएमला वंचितसोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही. उलट वंचितला सर्वाधिक फायदा झाला. यापुढेही वंचित आघाडीतून आणखी काही लोक बाहेर पडतील. ते बाहेर पडलेले लोक आमच्या पक्षात सामील होतील असा दावा करताना आठवले यांनी वंचितमधून बाहेर पडलेल्या एमआयएमचे स्वागतच केले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी राज्यातील विधानसभेत पुढील विरोधीपक्ष नेते वंचितचा असेल असा दावा केला होता. त्यामुळे वंचितच्या नेत्यांचे मनोबल वाढले होते. परंतु, आठवले यांच्या मते विरोधीपक्ष नेते होण्याइतकी मते वंचितला मिळणार नाही. लोकसभेला त्यांना मते मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसा लाभ होणार नाही, असंही आठवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेIndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी