शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 2:34 AM

काँग्रेसने विचारला प्रश्न; १८ ते २४ दरम्यान होणार दौरा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये जर सगळे काही ‘सामान्य’ आहे, तर मग ३६ केंद्रीय मंत्र्यांना तिकडे पाठवायचे कारण काय, असा प्रश्न काँग्रेसने गुरुवारी सरकारला विचारला. ‘प्रचार करणारे’ पाठवण्याची गरज का निर्माण झाली, असे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी टिष्ट्वटरवर विचारले.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेला घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत आणि राज्यात विकासाच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा एक गट या महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्याचे अंतिम स्वरूप शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरणार आहे.

‘अमित शहा म्हणाले की, काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य आहे. जर तसे आहे, तर ३६ प्रचार करणाऱ्यांना काश्मीरमध्ये पाठवण्याची गरज का? तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रचार न करणाºयांना का जाऊ दिले जात नाही’, असे कपिल सिबल यांनी विचारले. १८ ते २४ जानेवारीदरम्यान केंद्रशासित प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौरा करतील व गृहमंत्रालय त्यांच्या भेटीचे समन्वयन करील.स्थिती सामान्य नव्हे, तर घबराटीची‘३६ मंत्री जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा दिवस फिरतील, हे परिस्थिती सामान्य नव्हे, तर घबराट असल्याचे चिन्ह आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे ही घोडचूक असून, या अशा तात्पुरत्या उपायांनी काही साध्य होणार नाही, असे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून केंद्रीय मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरचा दौरा करण्याची ही दुसरी वेळ आहे.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपा