शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 18:59 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या समोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी राव यांनी वृत्त पत्रांच्या कात्रणांवरून आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगितले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांमध्ये पायी चालत निघाले आहेत, रस्त्याने चालताना त्यांचे अपघात होत आहेत. नुकताच औरंगाबादमध्ये मालगाडी अंगावरून गेल्याने रेल्वेरुळावर झोपलेल्या १६ जणांचा मृत्यू झाला होता. या स्थलांतरीत मजुरांना थांबविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 

औरंगाबादमध्ये ८ मे रोजी रेल्वेरुळावर झोपलेले १६ मजूर मालगाडीखाली चिरडले गेले होते. या घटनमुळे स्थलांतरीत मजुरांचे हाल आणि त्यांच्यावरील संकटांची भीषणता देशभर पाहिली गेली होती. यावर वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याला फटकारत सुप्रीम कोर्टाने ही याचिका नाकारली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या समोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी राव यांनी वृत्त पत्रांच्या कात्रणांवरून आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच कोण रेल्वे रुळावरून चालत आहे किंवा कोण नाही? यावर लक्ष ठेवणे अशक्य आहे. जर लोक गावी चालत जात असतील आणि थांबत नसतील तर त्यांना आम्ही कसे थांबवू शकतो, असा प्रश्न विचारला. तसेच यावर राज्य सरकारांनी पाऊले उचलायला हवीत असेही न्यायालयाने म्हटले. 

औरंगाबादच्या रेल्वे अपघातावर राव यांनी, जर कोणी रेल्वे रुळावर झोपत असेल तर कोण असे अपघात रोखू शकेल? असा प्रश्न विचारत याचिका फेटाळून लावली. यावेळी सरकारी पक्षाचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, प्रत्येक मजूर, कामगाराची त्याच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, त्यांच्याकडे संयम नाहीय. अशांना आम्ही थांबवू शकत नाही. 

महत्वाच्या बातम्या...

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Atmanirbhar Bharat Abhiyan कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले

अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातSupreme Courtसर्वोच्च न्यायालय