शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 18:59 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या समोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी राव यांनी वृत्त पत्रांच्या कात्रणांवरून आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगितले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांमध्ये पायी चालत निघाले आहेत, रस्त्याने चालताना त्यांचे अपघात होत आहेत. नुकताच औरंगाबादमध्ये मालगाडी अंगावरून गेल्याने रेल्वेरुळावर झोपलेल्या १६ जणांचा मृत्यू झाला होता. या स्थलांतरीत मजुरांना थांबविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 

औरंगाबादमध्ये ८ मे रोजी रेल्वेरुळावर झोपलेले १६ मजूर मालगाडीखाली चिरडले गेले होते. या घटनमुळे स्थलांतरीत मजुरांचे हाल आणि त्यांच्यावरील संकटांची भीषणता देशभर पाहिली गेली होती. यावर वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याला फटकारत सुप्रीम कोर्टाने ही याचिका नाकारली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या समोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी राव यांनी वृत्त पत्रांच्या कात्रणांवरून आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच कोण रेल्वे रुळावरून चालत आहे किंवा कोण नाही? यावर लक्ष ठेवणे अशक्य आहे. जर लोक गावी चालत जात असतील आणि थांबत नसतील तर त्यांना आम्ही कसे थांबवू शकतो, असा प्रश्न विचारला. तसेच यावर राज्य सरकारांनी पाऊले उचलायला हवीत असेही न्यायालयाने म्हटले. 

औरंगाबादच्या रेल्वे अपघातावर राव यांनी, जर कोणी रेल्वे रुळावर झोपत असेल तर कोण असे अपघात रोखू शकेल? असा प्रश्न विचारत याचिका फेटाळून लावली. यावेळी सरकारी पक्षाचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, प्रत्येक मजूर, कामगाराची त्याच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, त्यांच्याकडे संयम नाहीय. अशांना आम्ही थांबवू शकत नाही. 

महत्वाच्या बातम्या...

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Atmanirbhar Bharat Abhiyan कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले

अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातSupreme Courtसर्वोच्च न्यायालय