शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर - मोदी

By admin | Updated: June 11, 2014 18:28 IST

भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११- भारताच्या स्वातंत्र्याला  २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असे भावनिक आवाहनही त्यांनी लोकसभेतील सदस्यांना केले आहे. 
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींचे हे लोकसभेतील पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लोकसभेतील पहिल्याच भाषणात मोदींनी त्यांच्या सरकारची दोन प्रमूख उद्दीष्ट मांडले. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक नागरिकाकडे पाणी, वीज, शौचालय अशी मूलभूत सुविधा असलेले घर असायला हवे असा संकल्प मोदींनी केला. तसेच पाच वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीला १५० वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी आपण गांधींजींनी स्वच्छ भारत भेट म्हणून देऊ शकतो असे मोदींनी सांगितले. 
राष्ट्रपतींनी सादर केलेल्या अभिभाषणावर मोदी म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण ही आमच्यासाठी परंपरा नाही. त्यांनी अभिभाषणातून मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची, आश्वासनाची पूर्तता करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. निवडणुकीपूर्वी आपण सर्व उमेदवार होतो. पण लोकसभेत निवडून आल्यावर आपण आशेचे दूत आहोत. राष्ट्रपतींनी मांडलेल्या अजेंड्यातील आश्वासन पूर्ण करण्यास सरकार प्रयत्न करेल. यात काही अडचण आल्यास लोकसभेतील ज्येष्ठ सदस्यांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल अशी आशा दर्शवत त्यांनी विरोधकांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असे संकेत दिले. या भाषणात मोदींनी मुसलमान भाई असा उल्लेख करत समाजातील दलित व मुस्लिम समाजाचा विकास व्हायला हवे. समाजातील एक अंग अशक्त राहिल्यास समाज सशक्त होऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
>  देशातील सरकार हे केवळ श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठीही आहे. गरिबांना यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांची अंधश्रध्देतून मुक्तता करण्याची आवश्यकता आहे. 
> देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न करायला हवेत.
> महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे रुप दिले होते. त्यानुसार आता विकासाचे जनआंदोलन निर्माण करण्याची गरज. देशातील प्रत्येक व्यक्ती देशासाठी काम करतोय ही भावना निर्माण करायला हवी.  
> बलात्कारसारख्या गंभीर घटनांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे राजकीय नेत्यांनी टाळावे. अशा घटनांवर मनोवैज्ञानिक चर्चा करणे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. 
> भारताची स्कॅम इंडिया ही ओळख पुसून स्किल इंडिया ही नवी ओळख निर्माण करायची आहे. देशात युवकांचा भरणा असल्याने कौशल्यविकासावर भर देण्याची गरज. नुसती पदवी घेऊन पुरेसे नसते. तर त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे.