शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये झाले ऐतिहासिक ६४.६६ टक्के मतदान; किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:08 IST

पहिल्या टप्प्यातील १२१ जागांवरील १३१४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी १२१ जागांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३.७५ कोटी मतदारांपैकी ६४.६६ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. हे त्या राज्यातील आजवर झालेले सर्वाधिक मतदान आहे. राज्यात मतदान सुरू असताना काही ठिकाणी हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्या. उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी आपल्या ताफ्यावर राजदच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा केला. बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६७.३२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ समस्तीपूर (६६.६५ टक्के) आणि मधेपुरा (६५.७४ टक्के) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. पहिल्या टप्प्यात राजदचे तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा तसेच अनेक मंत्री अशा महत्त्वाच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा कारभार तसेच १२५ युनिट मोफत वीज, एक कोटीहून अधिक महिलांना १० हजार रुपयांची रोख मदत, सामाजिक सुरक्षा पेन्शनमध्ये वाढ अशा निर्णयांमुळे मतदार एनडीएलाच मतदान करेल अशी त्या आघाडीला आशा आहे. मात्र, बिहारमध्ये आता सत्तापालटासाठी मतदान करा, असे आवाहन इंडिया आघाडीकडून जनतेला करण्यात आले.

मतदान वाढल्याने काय घडले?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे ६४.६६ टक्के मतदान नोंदवले गेले. एकूण १८ जिल्ह्यांतील सर्व ४५,३४१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. यापूर्वी बिहारमध्ये २००० साली सर्वाधिक ६२.५७ टक्के मतदान झाले होते. यावेळी नितीशकुमार यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, तेवढे संख्याबळ नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी सरकार स्थापन केले.

शहरी मतदारसंघांमध्ये कमी मतदान

बिहारमध्ये गुरुवारी १८ जिल्ह्यांत मतदान झाले. मुजफ्फरपूर आणि गोपालगंज येथे दुपारी ३ वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर पाटणा जिल्ह्यात मतदानाचा टक्का केवळ ४८.६९ एवढाच होता. बंकीपूर येथे ३४.८० टक्के, दिघा येथे ३१.८९ टक्के आणि कुम्हरार येथे ३७.७३ टक्के या शहरी मतदारसंघांत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही.

‘मतदान आपली जबाबदारी’

मतदान हा अधिकार नाही, तर ती महत्त्वाची जबाबदारीही आहे, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले. बख्तियारपूर या मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी याबाबत पोस्ट केली.

‘राजद समर्थकांचा हल्ला’

मतदानादिवशी राजदच्या समर्थकांनी आपल्या ताफ्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी केला. हे लोक मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न करीत होते, असे त्यांनी नमूद केले.  

‘निवडणूक चोरी’ची तयारी : प्रियांका

हरयाणाप्रमाणेच बिहारमध्येही एनडीए ‘निवडणूक चोरी’च्या तयारीत असल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. विविध जाहीर सभांत त्यांनी निवडणूक आयोगही देशाची घटना तसेच लोकशाही कमकुवत करण्यासाठी सरकारशी हातमिळवणी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Records Historic 64.66% Voter Turnout; Peaceful Polling Except Minor Incidents

Web Summary : Bihar witnessed a historic 64.66% voter turnout in the first phase of assembly elections. Minor incidents of violence were reported. NDA hopes for victory due to Nitish Kumar's governance, while the opposition calls for change. Urban areas saw lower turnout.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Votingमतदान