शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दोन तासांच्या पावसात २० किमी पर्यंत रेंगाळली वाहने; गुरुग्राममध्ये कोंडीमुळे चार तास वाहने अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:00 IST

दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुग्रामध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

Gurugram Traffic Jam: दिल्ली-एनसीआरमध्ये पावसामुळे वातावरण थंड झाले असले तरी यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 'सायबर सिटी' म्हणून ओळख असलेल्या गुरुग्राममध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गुरुग्रामच्या रस्त्यांवर इतकी गर्दी होती की लोक तासनतास वाहतुकीत त्यांच्या वाहनांमध्ये अडकून पडले होते. सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने गाड्या जागच्या हालत नव्हत्या. या कोंडींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुग्राम ठप्प झाले आणि संपूर्ण शहरात सर्वात मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली आणि रॅपिड मेट्रो स्टेशनचीही अशीच परिस्थिती होती. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गुरुग्राममध्ये  वाहने २० किलोमीटरपर्यंत रेंगाळत होती.

सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ४८ वर चार किलोमीटर लांब वाहतूक कोंडी दिसत होती. हिरो होंडा चौक ते नरसिंहपूर पर्यंत, जिकडे पाहिलं तिकडे फक्त वाहने उभी दिसत होती. दिल्ली ते गुरुग्राम या मार्गावर लोकांनाही खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. ज्या प्रवासासाठी अर्ध्या तास लागतो त्यासाठी लोकांना तीन ते चार तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावे लागले.

या प्रचंड वाहतूक कोंडीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते लोक खूप संतापले आहेत आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत. पुन्हा एकदा प्रशासनाचा पर्दाफाश झाला आहे, दरवर्षी दावे केले जातात, पण दरवर्षी पावसाळ्यानंतरही पाणी साचते आणि अनेक भागात गंभीर वाहतूक कोंडी होते अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. सोमवारच्या पावसानंतर नरसिंहपूर, सेक्टर २९, सेक्टर ३१, सेक्टर ४५, सेक्टर ५६, डीएलएफ फेज ३ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने २ सप्टेंबरला सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून कंपन्यांना घरून काम देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपायुक्त अजय कुमार यांनी लोकांना ऑरेंज अलर्ट असल्याने घरीच राहण्याचा सल्ला दिला. सोमवारपासून अधूनमधून पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यासोबतच मेट्रो सेवा देखील विस्कळीत झाली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRainपाऊसUttar Pradeshउत्तर प्रदेश