शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:28 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. यावर आता काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. याव र आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या निकालाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. संपूर्ण राज्य काँग्रेस जिंकणार असे म्हणत होते आणि मग हे निकाल कसे आले. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे',असंही गेहलोत यांनी म्हणाले.

"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"

आज दिल्लीत काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अशोक गेहलोत म्हणाले, हा पराभव अतिशय गांभीर्याने घेतला जात आहे. संपूर्ण प्रसारमाध्यमे, एक्झिट पोल आणि सर्वसामान्य जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करणार असल्याचे सर्वेक्षण करत होते. त्यानंतर असे कोणते कारण होते की निकाल उलटे लागले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरगे साहेब आणि राहुल जी यांनी हे गांभीर्याने घेतले आहे. वरिष्ठ पर्यवेक्षक आणि सचिव यांना बोलावून मोकळेपणाने चर्चा झाली, असंही ते म्हणाले. 

अशोक गेहलोत म्हणाले, बैठकीत चांगली चर्चा झाली. तळाशी जाणे आवश्यक आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाच्या विजयाची चर्चा संपूर्ण देश आणि राज्यातून होत होती. निकाल उलटे येण्याचे कारण काय होते? आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, असंही गेहलोत म्हणाले. 

अशोक गेहलोत म्हणाले, “सामान्य लोकांच्या मनातही भीती आहे. ईव्हीएम हे कारण असू शकते किंवा परिस्थिती काहीही असू शकते. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्यांना आमची शंका दूर करण्यास सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत