शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 08:56 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका करताना गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली असा टोला भाजपाला लगावला आहे. 

अहमदाबाद - गुजरात निवडणुकीत झालेला भाजपाचा विजय हा जातीवाद आणि वंशवादाचा पराभव असल्याचं भाजपाध्यक्ष अमित शहा बोलले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला मिळालेलं यश पाहता विरोधकांच्या चेह-यावर हसू उमटलं आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय पक्ष आणि प्रमुखांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका करताना गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली असा टोला भाजपाला लगावला आहे. 

ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं आहे की, 'संतुलित निकाल दिल्याबद्दल मी गुजरातच्या जनतेचं अभिनंदन करते. हा भाजपाचा तात्पुरता विजय असून त्यांचा नैतिक पराभव आहे. गुजरातमधील जनतेने अत्याचार, भीती आणि सामान्यांसोबत झालेल्या अन्यायाविरोधात मतदान केलं आहे. गुजरातने 2019 च्या निवडणुकीसाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.

हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.

जनतेच्या अधिकाराची लढाई सुरुच राहणारगुजरात निवडणुकीत महत्वाचा चेहरा ठरलेल्या हार्दीक पटेलने आपली लढाई अजूनही सुरुच राहणार असल्याचं ट्विट केलं आहे. हार्दीकने ट्विट केलं आहे की, 'जनतेच्या अधिकाराची लढाई सुरुच राहील. आरक्षण, शेतकरी आणि तरुणांची लढाई. आम्ही प्रामाणिकपणा आणि सत्याच्या आधारे लढू. जो लढेल तोच जिंकेल. इन्कलाब जिंदाबाद'. दुस-या ट्विटमध्ये हार्दीकने लिहिलं आहे की, 'मी भाजपाला त्यांच्या विजयासाठी अभिनंदन करणार नाही, कारण त्यांनी दगाफटका करत विजय मिळवला आहे. गुजरातमधील जनता जागरुक झाली आहे, पण अजून जागरुक होण्याची गरज आहे. एव्हीएमसोबत छेडछाड झाली आहे हे सत्य आहे'.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा