शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 08:56 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका करताना गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली असा टोला भाजपाला लगावला आहे. 

अहमदाबाद - गुजरात निवडणुकीत झालेला भाजपाचा विजय हा जातीवाद आणि वंशवादाचा पराभव असल्याचं भाजपाध्यक्ष अमित शहा बोलले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला मिळालेलं यश पाहता विरोधकांच्या चेह-यावर हसू उमटलं आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय पक्ष आणि प्रमुखांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका करताना गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली असा टोला भाजपाला लगावला आहे. 

ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं आहे की, 'संतुलित निकाल दिल्याबद्दल मी गुजरातच्या जनतेचं अभिनंदन करते. हा भाजपाचा तात्पुरता विजय असून त्यांचा नैतिक पराभव आहे. गुजरातमधील जनतेने अत्याचार, भीती आणि सामान्यांसोबत झालेल्या अन्यायाविरोधात मतदान केलं आहे. गुजरातने 2019 च्या निवडणुकीसाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.

हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.

जनतेच्या अधिकाराची लढाई सुरुच राहणारगुजरात निवडणुकीत महत्वाचा चेहरा ठरलेल्या हार्दीक पटेलने आपली लढाई अजूनही सुरुच राहणार असल्याचं ट्विट केलं आहे. हार्दीकने ट्विट केलं आहे की, 'जनतेच्या अधिकाराची लढाई सुरुच राहील. आरक्षण, शेतकरी आणि तरुणांची लढाई. आम्ही प्रामाणिकपणा आणि सत्याच्या आधारे लढू. जो लढेल तोच जिंकेल. इन्कलाब जिंदाबाद'. दुस-या ट्विटमध्ये हार्दीकने लिहिलं आहे की, 'मी भाजपाला त्यांच्या विजयासाठी अभिनंदन करणार नाही, कारण त्यांनी दगाफटका करत विजय मिळवला आहे. गुजरातमधील जनता जागरुक झाली आहे, पण अजून जागरुक होण्याची गरज आहे. एव्हीएमसोबत छेडछाड झाली आहे हे सत्य आहे'.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा