शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नेटिझन्ससमोर सरकार नरमले, नेट न्यूट्रलिटीला पाठिंबा देणार ?

By admin | Updated: April 14, 2015 18:45 IST

नेट न्यूट्रलिटी अबाधित ठेवण्यासाठी नेटिझन्सने सुरु केलेल्या मोहीमेसमोर केंद्र सरकार नरमले असून नेट न्यूट्रलिटीला केंद्र सरकारही पाठिंबा देईल अशी चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १४ - नेट न्यूट्रलिटी अबाधित ठेवण्यासाठी नेटिझन्सने सुरु केलेल्या मोहीमेसमोर केंद्र सरकार नरमले असून नेट न्यूट्रलिटीला केंद्र सरकारही पाठिंबा देईल अशी चिन्हे आहेत. या प्रकरणावर केंद्र सरकारने एक समितीही नेमली आहे. 
 
नेट न्यूट्रलिटीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून सोशल मिडीयावर या विरोधात मोहीमही सुरु आहे. शाहरुख खान, फरहान अख्तर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनीही नेट न्यूट्रलिटीचे समर्थन केले आहे. टेलिकॉम कंपन्या इंटरनेटच्या वापरावर फिल्टर लावण्याचा प्रयत्न करत असून या माध्यमातून इंटरनेटवर आधारित प्रत्येक अॅप व वेबसाईटसाठी स्वतंत्र पॅकेज  आकारण्याची हालचाल  इंटरनेट सुविधा देणा-या कंपन्यांनी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागेल. टेलिकॉम कंपनांच्या या चलाखीविरोधात सोशल मिडीयावर टीकेची झोड उठली असून टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाविरोधात ट्रायकडे लाखो ईमेल्स पाठवले जात आहेत. 
 
सोशल मिडीयावरील या आक्रमक मोहीमेसमोर आता केंद्र सरकारही नरमले आहे. संपर्क व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी नेट न्यूट्रलिटीला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. प्रसाद म्हणाले, इंटरनेट ही काळाची गरज असून इंटरनेटवर कोणताही भेदभाव न करता सर्व माहिती प्रत्येकाला उपलब्ध होणे गरजेचे आहे. दूरसंचार खात्याने यासंदर्भात एक समिती नेमली असून ही समिती मेच्या दुस-या आठवड्यापर्यंत आपला अहवाल सादर करेल असे त्यांनी सांगितले. डिजिटल इंडियामोहीमेसाठी समाजातील तळागाळापर्यंत इंटरनेट पोहोचणे गरजेचे आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.  
केंद्र सरकारने नेमलेली समिती ही ट्रायच्या अंतर्गत येणार नाही. त्यामुळे नेट न्यूट्रलिटीसंदर्भात ट्रायने टेलिकॉम कंपन्याच्या बाजूने निकाल दिला तरी या समितीच्या अहवालाद्वारे केंद्र सरकार नेट न्यूट्रलिटी अबाधित ठेवू शकते. 
 
फ्लिपकार्टची एअरटेलसोबतच्या करारातून माघार
दरम्यान नेट न्युट्रॅलिटीच्या मुद्यावरून सोशल मीडियावर वातावरण तापलेले असून ऑनलाइन व्यवहार क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टवरही टीकेचा भडिमार झाला आहे. त्यामुळे नेटीझन्सच्या रोषास पात्र ठरलेल्या या कंपनीने एअरटेल सोबतच्या 'झिरो प्लॅन'मधून माघार घेतली असून कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरून त्यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. इंटरनेटमुळेच आम्ही इथपर्यंत पोचलो असून आमचा नेट न्युट्रॅलिटीवर विश्वास असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. 
 
नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ?
नेट न्यूट्रॅलिटी हे इंटरनेट वापरासंबंधीचे तत्त्व आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मुक्तपणे संवाद साधण्याचा ग्राहकाचा हक्क यात अबाधित केला गेला आहे. यातली एक बाब अशी की, कुठलीही इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी तिने पुरविलेल्या इंटरनेटवरून कुठल्याही संकेतस्थळाचा वापर करण्यापासून ग्राहकाला रोखू शकत नाही; मात्र नेट न्यूट्रॅलिटी नसेल तर टेलिकॉम कंपन्या इंटरनेट वापरण्यावर बंधने आणू शकतात.
 
टेलिकॉम कंपन्यांचा नफा घटला
■ वाढीव दर आकारण्याचे कारण म्हणजे सुरुवातीला मोबाइलचा वापर फोन किंवा एसएमएस करण्यासाठी केला जात असे; मात्र व्हॉट्स अँप, व्हायबर, हाईक सारखे अॅप्स आले त्यामुळे मेसेज आणि फोनचे प्रमाण घटले. पर्यायाने टेलिकॉम कंपन्यांचा नफा घटला. त्यामुळे त्यांना इंटरनेटच्या नफ्यातील भागीदारी हवी आहे. तसेच फेसबुक, गुगल या कंपन्या इतरांचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरून नफा कमवत आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून टेलिकॉम कंपन्यांना आपले दर हवे तसे, हवे तितके ठेवण्याची सवलत हवी आहे.
'एआयबी'वर व्हिडीओ व्हायरल 
■ अभद्र भाषेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 'एआयबी' या शोच्या माध्यमातून नेट न्यूट्रॅलिटीबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही हास्यकलाकारांनी नागरिकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
 
फेसबुकवरही मोहीम
■ ट्रायच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी फेसबुकरही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सेव्ह द इंटरनेट या नावाने पेज तयार करून त्यावर ट्रायच्या भूमिकेबाबत हरकती नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.