शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 05:42 IST

देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी, पेन्शनरांना होणार फायदा

ठळक मुद्देदेशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी, पेन्शनरांना होणार फायदा

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ११ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचा फायदा ४८.३४ लाख केंद्रीय कर्मचारी, तसेच ६५.२६ लाख पेन्शनर व्यक्तींना होईल. त्यापायी केंद्र सरकारचे ३८ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा निर्णय १ जुलैपासून पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढविल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्र व इतर काही राज्ये तसाच निर्णय घेतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडभरात झालेली ही दुसरी बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या निवासस्थानी पार पडली. कोरोना साथीमुळे जानेवारी २०२० पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाई भत्ता वाढवावा अशी शिफारस केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मंडळाने (जेसीएम) केंद्र सरकारला केली. या निर्णयाने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्क्यांऐवजी २८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. कॅबिनेट सचिव हे जेसीएमचे अध्यक्ष आहेत. यात केंद्रीय कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी व वरिष्ठ सरकारी अधिकारी सदस्य आहेत.

असा वाढणार महागाई भत्तामहागाई भत्ता तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल. महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली आहे व तो मूळ वेतनाच्या (बेसिक) आधारे देण्यात येतो. 

ईपीएफओचे निवृत्त सहायक आयुक्त ए. के. शुक्ला यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना याआधी १७ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता त्यात ११ टक्क्यांची वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना आता एकूण २८ टक्के महागाई भत्ता मिळेल. ज्याचा मूळ पगार ३१५८० रुपये असेल त्याला २८ टक्क्यांप्रमाणे दर महिना ८८३४ रुपये महागाई भत्ता मिळेल. याआधीच्या १७ टक्क्यांप्रमाणे हिशेब केला, तर त्या कर्मचाऱ्याला ५३६४ रुपये इतकाच महागाई भत्ता मिळाला असता. 

७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी निकषराज्य सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याकरिता निकष निश्चित करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निकषांच्या पुर्ततेच्या अधीन राहून सुधारित वेतनश्रेणी १ जुलै २०१२१ पासून परिणामकारक राहील. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविलेमहाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- ‘अ’मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट ‘अ’मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळ कार्योत्तर मान्यता देण्यात आली. 

शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी (वेतनस्तर एस-२३3 : ६७७००-२०८७०० व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ (वेतनस्तर एस-२० : ५६१००-१७७५००) यांचे निवृत्तीचे वय ३१ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी ६२ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसाMaharashtraमहाराष्ट्रProvident Fundभविष्य निर्वाह निधीHealthआरोग्यEmployeeकर्मचारी