शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

तीर्थस्थळांचे कचरा व्यवस्थापन कसोशीने करण्याचा निर्धार

By admin | Published: October 29, 2015 10:07 PM

भारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारतात हिंदूंची देवालये अन्यधर्मीय प्रार्थनास्थळांच्या तुलनेत सर्वाधिक अस्वच्छ कशी, हा कळीचा सवाल सोशल साईट््सवर उपस्थित होताच, प्रमुख तीर्थस्थळे स्वच्छ व सुंदर बनवण्याची मोहीम केंद्रीय पर्यटन, तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने हाती घेतली आहे. तीर्थस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रचलित नियमावलीत सुधारणा करण्याबरोबरच राज्य सरकारांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे केंद्राने ठरवले आहे.हिंदू देवालयात खरी समस्या देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या फुला- पानांसह पूजा साहित्यातून गोळा होणाऱ्या निर्माल्याच्या विल्हेवाटीची आहे. भाविकांच्या धार्मिक भावना न दुखावता या निर्माल्याची विल्हेवाट योग्यप्रकारे कशी लावता येईल, यावर व्यापक विचारविनिमय सध्या सुरू आहे. प्लास्टिकवर सर्रास बंदी घालण्याऐवजी राज्य सरकारच्या सहकार्याने तीर्थस्थळांवर प्लास्टिक उत्पादनांचे वैज्ञानिक पद्धतीने रिसायकलिंग करण्याची जबाबदारी वितरकांवर सोपवण्याचे कडक निर्बंधही लवकरच घालण्यात येणार आहेत. तीर्थस्थळांवर गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, यासंबंधी राज्य सरकारांकडूनही सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्यांनी अनेक चांगले प्रस्तावही पाठवले आहेत. या कचरा व्यवस्थापनात मुख्य भूमिका नगरपालिका, महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना वठवावी लागणार आहे. देवालयातल्या जलाभिषेकाचे पाणी, तेल, तूप, दूध, पंचामृत, नैवेद्यात वाहिलेली फळे, इत्यादी गोष्टी अनेक ठिकाणी गटाराद्वारे गंगेच्या प्रवाहात सोडल्या जातात. नव्या नियमांनुसार तीर्थस्थळाच्या गावात सांडपाण्याचे नाले, गटारी यांचे योग्य प्रकारे निस्सारण (रिसायकलिंग) केल्यानंतरच हे पाणी नद्यांमधे सोडता येईल. त्याच्या कठोर प्रबंधनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल.